मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात राज्यातील विविध प्रश्नांसंदर्भात वर्षा निवासस्थानी बैठक सुरू झाली आहे.
राज्यात मराठा आरक्षणासंदर्भात निर्माण झालेल्या पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर ही अत्यंत महत्त्वाची बैठक असल्याचे सांगण्यात येते. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या संदर्भात दिलेल्या अंतरिम निकालामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघत आहे. मराठा समाजाकडून सरकार विरोधात वातावरण तयार केले जात आहे. तर विविध प्रवेश प्रक्रियेवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.याचा मराठा आरक्षणाच्या प्रवेशाचा फटका बसला आहे. यामुळे या बैठकीत राज्य सरकारकडून कोणकोणत्या उपाययोजना करण्यात येतील किंवा त्यासाठी अध्यादेश काढता येईल का, यावर महत्त्वाची चर्चा होत असल्याचे सांगण्यात येते.