महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'आयआयटी' मुंबईतील विद्यार्थी हरवला, तक्रार दाखल

देशातील सुरक्षित व नवीन अभ्यासक्रमासाठी प्रसिद्ध असलेल्या आयआयटी मुंबईचा एक विद्यार्थी कॅम्पसच्या परिसरातून हरवला आहे. हर्ष दिनेशकुमार शर्मा हा गेल्या १५ दिवसांपासून हरवला आहे. याबाबत पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

By

Published : Dec 14, 2019, 2:16 AM IST

IIT Mumbai student lost story
हर्ष दिनेशकुमार शर्मा

मुंबई- देशातील सुरक्षित व नवीन अभ्यासक्रमासाठी प्रसिद्ध असलेल्या आयआयटी मुंबईचा एक विद्यार्थी कॅम्पसच्या परिसरातून हरवला आहे. हर्ष दिनेशकुमार शर्मा हा गेल्या १५ दिवसांपासून हरवला आहे. याबाबत पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हर्षने देशभरातील आयआयटीच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या जेईई अॅडव्हान्स या परीक्षेत देशातून ४४८ वा क्रमांक मिळवला आहे. बारावीत ९६ टक्के गुण मिळूवन तो उत्तीर्ण झाला आहे. त्याने आयआयटी मुंबईत एमटेक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. तो सध्या तृतीय वर्षात शिकत आहे. गेल्या 2 वर्षांपासून तो तणावग्रस्त होता व त्याच्यावर वैद्यकीय उपचारही सुरू होते. त्यामुळे आयआयटीने विशेष दखल घेऊन त्याच्यासोबत एका पालकाला राहण्याची अनुमती दिली होती.

त्याचे वडील सोबत राहात असताना २२ नोव्हेंबरला ते गावाला लग्नाला जाण्यासाठी निघणार होते. त्यामुळे त्याचे वडील तयारी करत होते. इतक्यात हर्ष मोबाइल किंवा अन्य कोणतेही साहित्य न घेता आयआयटी कॅम्पसमधून बाहेर पडला. तो कॅम्पसमधून बाहेर जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यानंतर बराचवेळ तो परत आला नाही म्हणून जेव्हा त्याच्या वडिलांनी परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली, तेव्हा तो आढळून आला नाही. अखेर पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मित्र व नातेवाईक यांच्याकडे तो सापडत नसल्याने हर्षचे कुटुंबीय चिंतेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details