महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'हिंमत असेल तर भाजपने महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करून दाखवावे'

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार किमान समान कार्यक्रमाला धरुनच चालत आहे. आघाडीतील कोणताही पक्ष एकमेकांवर नाराज नाही. केंद्र सरकार महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करण्यासाठी कुटील डाव खेळत आहे. मात्र, राज्यातील जनता त्याला बळी पडणार नाही, अशी प्रतिक्रिया कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता नवाब मलिक दिली.

By

Published : Jan 28, 2020, 1:11 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता नवाब मलिक
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता नवाब मलिक

मुंबई - राज्यातील जनता केंद्र सरकारच्या कुटील कारस्थानाला बळी पडणार नाही. हिंमत असेल, तर भाजपने महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करून दाखवावे, असे वक्तव्य कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

भाजपच्या डावाला राज्यातील जनता बळी पडणार नाही


सोनिया गांधी यांचा या सरकारला विरोध होता. परंतु, आम्ही त्यांना राजी केले. घटनाबाह्य काम करणार नाही, असे शिवसेनेकडून 'लिहून' घेतले आहे. शिवसेनेने जर उद्देशिकेबाहेर जाऊन काम केले, तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असे अशोक चव्हाण यांनी वक्तव्य केले होते. किमान समान कार्यक्रमाला धरुनच आघाडीतील पक्ष सरकार चालवत आहेत. अशोक चव्हाणांच्या यांच्या वक्तव्यावर कोणीही नाराज नाही. त्यांचे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने दाखवले जात आहे. त्यामुळे नाराजीचा प्रश्नच नाही, असे स्पष्टीकरण मलिक यांनी दिले.

हेही वाचा - तसं' झाल्यास सरकारमधून बाहेर पडण्याच्या आम्हाला सुचना, अशोक चव्हाणांचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र सरकार जर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) अधिकाऱ्यांना सहकार्य करत नसेल, तर त्यांना गंभीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते. त्याचाही समाचार मलिकांनी घेतला. कोरेगाव भीमा प्रकरणी राज्य सरकारची चौकशी सुरू आहे. राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करू नये यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असेल, ते आम्ही सहन करणार नाही. भाजप सरकारने दबावाचा वापर करून फसवी चौकशी केली असेल तर ती आता उघड होईल.

ABOUT THE AUTHOR

...view details