महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आज.. आत्ता.. सायंकाळी ७ वाजेपर्यंत महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर...

पैठण तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी फक्त पाच मिनिटांत आटोपली. ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनच्या संदर्भातील तक्रारींची चौकशी हवी, असे मत माजी निवडणूक अधिकारी नीला सत्यनारायण यांनी व्यक्त केले. कुर्ल्यातील कसाईवाड्यात घरावरील कचऱ्याने एकाचा बळी घेतला. अमिता राजानी यांचे ३०० वजन बेरिअॅट्रिक शस्त्रक्रियेनंतर ८६ किलो आहे. आयपीएलमध्ये दिल्लीचा संघ हैदराबादशी भिडणार.

By

Published : May 8, 2019, 7:03 PM IST

आज.. आत्ता.. सायंकाळी ७ वाजेपर्यंत महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर...

औरंगाबादच्या पालकमंत्र्यांनी आटोपला केवळ पाच मिनिटात दुष्काळी दौरा
औरंगाबाद - पैठण तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी फक्त पाच मिनिटांत आटोपली. यामुळे शेतकऱ्यात त्यांच्या या दौऱ्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात असून हा दौरा प्रसारमाध्यमात झळकण्यासाठीच होता का, अशी चर्चा गावकरी करत आहेत. वाचा सविस्तर..

ईव्हीएमसह व्हीव्हीपॅट मशीनबाबत तक्रारींची चौकशी व्हावी - नीला सत्यनारायण
मुंबई - ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनच्या संदर्भामध्ये ज्या ज्या तक्रारी आल्या आहेत त्याची चौकशी व्हायला हवी, असे मत माजी निवडणूक अधिकारी नीला सत्यनारायण यांनी व्यक्त केले. लोकशाहीत जर चुकीचे काही घडत असेल तर आपण त्याच्याकडे लक्ष दिले पाहिजे. निवडणूक आयोगाची ही जबाबदारी असल्याचेही त्या म्हणाल्या. वाचा सविस्तर..

कुर्ल्यातील कसाईवाड्यात घरावरील कचऱ्याने घेतला एकाचा बळी
मुंबई - कुर्ला पूर्व भागातील कसाईवाडा हा डोंगर उतारावरील भागात असल्याने येथे मोठ्या प्रमाणात दुमजली तिमजली झोपड्या आहेत. येथील झोपड्यांवर दाव निर्माण होऊन येथील झोपड्या कोसळ्याच्या घटना सतत घडत असतात. अशीच एक घटना आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. यात एक ठार तर एक जण जखमी झाले आहेत. वाचा सविस्तर..

३०० किलोवरुन ८६ किलो; आशियातील सर्वाधिक लठ्ठ महिला अशी झाली बारीक
पालघर - वयाच्या सहाव्या वर्षापासून वजन वाढण्याची समस्या असलेल्या एका महिलेचे वजन आशियातील सर्वाधिक ठरले. ३०० किलो वजन असलेल्या या महिलेचे वजन ८६ किलो इतके करण्यात यश आले. वजन कमी करण्यासाठी मोलाचे सहाय्य करणाऱ्या डॉक्टरांनी ही घटना लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्याची तयारी सुरु केली आहे. वाचा सविस्तर..

IPL : पहिल्यांदाच चॅम्पियन होण्यासाठी दिल्ली लावणार बाजी, पराभूत संघ जाणार बाहेर
दिल्ली - आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा चॅम्पियन होण्याचे स्वप्न पाहणार दिल्लीचा संघ बुधवारी नशीबाने प्लेऑफमध्ये पोहोचलेल्या हैदराबादशी भिडणार आहे. मात्र, या सामन्यात जो संघ पराभूत होईल, त्या संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे. वाचा सविस्तर..

ABOUT THE AUTHOR

...view details