मुंबई- मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांच्या कारभाराला कंटाळून, काही नाराज काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षांशी जवळीक साधली होती. मात्र, मिलिंद देवरा यांनी मुंबई अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेताच या नाराज कार्यकर्त्यांची नाराजी दूर केली आहे. देवरा यांच्यामुळे काँग्रेसमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
दक्षिण मुंबईत अल्पसंख्यक मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत. या मतदारांमध्ये कोणताही वेगळा संदेश जाऊ नये, यासाठी काँग्रेस सोडून गेलेले अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष निजामुद्दीन रायन यांना पुन्हा अल्पसंख्याक सेलमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर नागपाडा आणि मुंबादेवी विधानसभा मतदार संघाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे.