महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रेल्वेचा विक्रोळी स्थानकात धोकादायक पादचारी पूल; लवकर पाडण्याची प्रवाशांची मागणी

या घटनेनंतर खबरदारी म्हणून मध्य रेल्वे, पालिका आणि आयआयटी यांच्या संयुक्त तपासणीत पाच पादचारी पूल धोकादायक ठरवले होते.

By

Published : May 10, 2019, 11:33 PM IST

Updated : May 10, 2019, 11:54 PM IST

रेल्वेचा विक्रोळी स्थानकात धोकादायक पादचारी पूल

मुंबई - सीएसएमटी येथे झालेल्या पादचारी पूल दुर्घटनेनंतर मध्य रेल्वेवरील पाच पादचारी धोकादायक पूल 30 एप्रिलपर्यत तोडण्यात येणार होते. प्रत्येक आठवड्याला एक पादचारी पूल मध्य रेल्वेच्या इंजिनिअरींग विभागाकडून तोडण्यात येणार होते. मात्र, एक महिना उलटून गेला तरी रेल्वेकडून विक्रोळी स्थानकामधला पादचारी पूल पाडण्याचे काम पूर्ण झाले नाही. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

रेल्वेचा विक्रोळी स्थानकात धोकादायक पादचारी पूल; लवकर पाडण्याची प्रवाशांची मागणी

सीएसएमटी स्थानकालगतचा पादचारी पूल कोसळल्याने अनेकांना जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर खबरदारी म्हणून मध्य रेल्वे, पालिका आणि आयआयटी यांच्या संयुक्त तपासणीत पाच पादचारी पूल धोकादायक ठरवले होते. मध्य रेल्वेच्या मार्गावरील भांडुप स्थानकातील कल्याण दिशेचा, दिवा स्थानकातील ठाणे दिशेचा, विक्रोळीचा सीएसएमटी दिशेचा, कुर्ला स्थानकातील कल्याण दिशेचा आणि कल्याण स्थानकातील पादचारीपुलाचा यात समावेश आहे. पूल जुने झाले असून त्यांना पाडण्यात आले आहे. मात्र, या धोकादायक पुलांमध्ये विक्रोळीचा सीएसएमटी दिशेचा पुलावर अद्याप हातोडा पडलेला नाही.

या धोकादायक पुलाच्या शेजारी नव्या पुलाचे काम सुरू आहे. हे पूर्ण झाल्याशिवाय हा पूल पाडण्यात येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या नव्या पुलाच्या कामाला तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधी जावू शकतो यामुळे हा पूल तोपर्यंततरी रहदारीसाठी बंद करावा अशी मागणी आता प्रवाश्यांकडून होत आहे.

जेव्हा ट्रेन या पुलाच्या खालून जाते तेव्हा या पुलाला हादरे बसतात. हा पादचारी पूल अनेक वर्षे जुना आहे. दुसरा पूल जेव्हा बनेल तेव्हा बनेल परंतु हा पूल बंद करण्यात आला पाहिजे असे सामाजिक कार्यकर्ते रॉबर्ट डिसोझा यांनी सांगितले.

Last Updated : May 10, 2019, 11:54 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details