महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 23, 2021, 7:26 PM IST

ETV Bharat / state

"आमच्या लेकरांची लस परदेशात का पाठवली? पोस्टर्स प्रकरणी काँग्रेसवर कारवाई करा"

भाजपाचे उत्तर भारतीय मोर्चाचे महाराष्ट्र अध्यक्ष संजय पांडे यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे. 'भारताला कोरोनाशी लढत असताना काँग्रेस नामक व्हायरसशीही लढावं लागत आहे. काँग्रेस आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा मलीन करत आहे. काँग्रेसने मुंबईभर पोस्टर्स लावले. त्यामुळे पोस्टर्स लावणाऱ्यांवर कारवाई करावी', असे पांडेंनी म्हटले आहे.

mumbai
मुंबई

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे उत्तर भारतीय मोर्चाचे महाराष्ट्र अध्यक्ष संजय पांडे यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे. 'कोरोना वैश्विक महामारीशी संपूर्ण जग लढत आहे. अशामध्ये सर्व देश एकमेकांची मदत करीत आहेत. जेव्हा भारताला आवश्यकता पडली तेव्हा ऑक्सिजन असो, व्हेंटिलेटर असो, रेमडेसिवीर इंजेक्शन असो; इतकेच काय तर लससुध्दा इतर देशांनी भारताला मदत म्हणून दिली. लसीसाठी कच्चा माल हा परदेशातून आयात करावा लागतो. अशामध्ये भारताला कोरोनाशी लढत असताना काँग्रेस नामक व्हायरसशीही लढावं लागत आहे', असे संजय पांडे यांनी म्हटले आहे.

"आमच्या लेकरांची लस परदेशात का पाठवली? पोस्टर्स प्रकरणी काँग्रेसवर कारवाई करा"

दिल्लीतही झळकले पोस्टर्स

मुंबई काँग्रेसने मुंबईभर लसीकरणासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पोस्टर्स लावले आहेत. असे पोस्टर मुंबईच्या आधी दिल्लीत आम आदमी पक्ष आणि काँग्रेसकडून लावण्यात आले होते. त्यावरून खूप राजकारण पेटले. पोस्टर लावणाऱ्या लोकांवर दिल्ली पोलिसांनी कारवाईही केली. आता तसेच पोस्टर मुंबई काँग्रेसने मुंबईभर लावले आहेत. त्यामुळे विरोधक काँग्रेसवर टीका करत आहेत.

'पोस्टर्स लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करा'

'काँग्रेसने लावलेल्या पोस्टर्सचा आम्ही निषेध करतो. ते फक्त आणि फक्त भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलीन करण्याचा आणि भारतातील लोकांमध्ये भ्रम पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही सरकारकडे यासंदर्भात मागणी करतो, की असे पोस्टर्स लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. त्यांच्यावर पॅन्डामिक ॲक्टच्या अंतर्गत गुन्हा नोंद करावा', असे भाजपा नेते संजय पांडे यांनी म्हटले आहे.

काय आहे पोस्टर्समध्ये?

"मोदी जी, आमच्या लेकरांची लस परदेशात का पाठवली?" असे पोस्टर्स दिल्लीनंतर मुंबईभर लावण्यात आले. दिल्लीत पोलिसांनी अनेकांना अटक केली. त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले की 'हेच पोस्टर मी शेअर केले आहे. आता मलाही अटक करा'.

हेही वाचा -दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम

ABOUT THE AUTHOR

...view details