महाराष्ट्र

maharashtra

"इंदिरा गांधींबद्दल तथ्यहीन अनादर काँग्रेस खपवून घेणार नाही"

By

Published : Jan 16, 2020, 3:11 PM IST

संजय राऊत यांनी बुधवारी पुण्यात मुलाखती दरम्यान एका प्रश्नाचे उत्तर देताना इंदिरा गांधी यांबाबत एक विधान केले. यात त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करिम लाला यांच्यात भेट झाली असल्याचे म्हटले होते.

balasaheb-thorat
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

मुंबई - भारतरत्न इंदिरा गांधी यांच्याबद्दल केलेले विधान काँग्रेस खपवून घेणार नसून, या पुढील काळातही आमच्या राष्ट्रीय नेत्यांबद्दल बोलताना भविष्यात त्यांनी विचारपूर्वक विधाने करावी, असा इशारा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना दिला आहे. राऊत यांनी बुधवारी पुण्यात मुलाखती दरम्यान एका प्रश्नाचे उत्तर देताना इंदिरा गांधी यांबाबत एक विधान केले. यात त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अंडरवर्ल्ड डॉन करिम लाला यांच्यात भेट झाली असल्याचे म्हटले होते.

"इंदिरा गांधींबद्दल तथ्यहीन अनादर काँग्रेस खपवून घेणार नाही"

हेही वाचा - लोकमान्य टिळक एक्सप्रेसचे ८ डबे ओडिशात घसरले, ३० जखमी, ४ गंभीर

थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले, की 'इंदिराजी गांधी या देशाच्या महान नेत्या होत्या. 1975 मध्ये मुंबईतील व देशातील गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्याचे काम त्यांनी केले. तसेच त्यांनी मुंबईतील स्मगलरांचे रॅकेट पूर्णपणे उद्ध्वस्त केले.' ज्या करीम लालाबद्दल बोलले जात आहे, त्यासहीत हाजी मस्तान युसुफ पटेल सारख्या अनेक गुन्हेगारी जगताशी संबंधित व्यक्तींना जेलमध्ये टाकून त्यांच्या मुसक्या आवळण्याचा काम इंदिरांजींनी केले होते.

थोरातांचे फडणवीसांना प्रत्युत्तर -

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना वर्षा या शासकीय निवासस्थानी कुख्यात गुंडाला भेटल्याची छायाचित्रे महाराष्ट्राने पाहिली आहेत. आपल्या सत्ताकाळात मुन्ना यादव सारख्या गुंडांची महामंडळावर नियुक्ती करून त्याला संरक्षण देणाऱ्या फडणवीसांनी राजकारणातील गुन्हेगारी बाबत बोलू नये. फडणवीसांनी राईचा पर्वत करण्याची आपली सवय सोडावी. छत्रपती शिवरायांचा अपमान करून आपल्या पक्षाने गमावलेली प्रतिमा सावरण्यासाठी भारतरत्न दिवंगत इंदिराजी गांधी यांचा अवमान करण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये, असे ते शेवटी म्हणाले.

संजय राऊतांचे स्पष्टीकरण -

गुरूवारी संजय राऊत यांनी या विधानाबाबत स्पष्टीकरण दिले. 'जेव्हा जेव्हा इंदिरा गांधीवर टीका झाली तेव्हा त्यांना पाठिंबा देण्याचे काम आम्ही केले आहे. काही लोक विनाकारण वाद निर्माण करत आहेत.' तसेच जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी हे विधान मागे घेत असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details