महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 17, 2019, 9:49 PM IST

Updated : Jul 18, 2019, 4:32 AM IST

ETV Bharat / state

आंतरराष्ट्रीय न्यायालयात कुलभूषण यांना दिलासा; मात्र, भारताने दक्ष राहावे - उज्ज्वल निकम

कुलभूषण जाधव यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयातून दिलासा मिळाला आहे. मात्र, भारताला आताही सावध राहण्याची गरज असल्याचे मत उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.

कुलभूषण जाधव यांच्याबद्दल बोलताना सरकारी वकील उज्ज्वल निकम

मुंबई- कुलभूषण जाधव यांचे वकीलपत्र कुणीही घ्यायचे नाही, असा ठराव पाकिस्तानमधील लाहोर उच्च न्यायालयाच्या सर्व वकिलांनी केला आहे. कुणीही हे वकिलपत्र घेतल्यास त्याच्यावर बहिष्कार टाकण्यात येईल, अशी धमकी देखील त्यांनी दिली आहे. त्यामुळे भारताला कुलभूषण यांच्या वकिलाबाबत दक्ष राहावे लागेल, असा सल्ला सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिला आहे.

कुलभूषण जाधव यांच्याबद्दल बोलताना सरकारी वकील उज्ज्वल निकम

आंतरराष्ट्रीय न्यालयात आज कुलभूषण जाधव यांना दिलासा देण्यात आला. त्यांना काऊन्सिलर अॅक्सेस देण्यात आला. त्यामुळे भारताचे अधिकारी कुलभूषण जाधव यांना भेटू शकणार आहे. त्यानंतर पाकिस्तानने जाधव यांच्याकडून घेतलेला तथाकथित जबाब मारहाण करून घेतला आहे का? खोट्यारितीने त्यांच्याकडून हा जबाब नोंदवून घेण्यात आला, हे आपण सिद्ध करू शकणार आहोत. त्यानंतर पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयातून हा खटला हलवता येणार आहे. त्यामुळे कुलभूषण जाधव यांना न्याय मिळेल, असे उज्ज्वल निकम म्हणाले.

पाकिस्तान न्यायालयाचा निर्यण मान्य करेल का?

जगाच्या डोळ्यात धुळ फेकण्यासाठी पाकिस्तान सर्व निर्यण मान्य करेल. कुलभूषण जाधव यांना काऊन्सिलर अॅक्सेस देखील देईल. मात्र, जाधव यांना नैसर्गिक पद्धतीने न्याय मिळेल का? त्यांना चांगला वकील मिळेल का? याबाबत उज्ज्वल निकम यांनी भिती व्यक्त केली आहे. मात्र, भारत दक्ष राहून कुलभूषण जाधव यांची सुटका करेल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Last Updated : Jul 18, 2019, 4:32 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details