महाराष्ट्र

maharashtra

विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनांवर उपनगरात कारवाई, 50 वाहने जप्त

By

Published : Apr 7, 2020, 9:22 PM IST

टाळेबंदीच्या काळात विनाकारण फिरणाऱ्यांची 50 वाहने मुंबई उपनगरातून जप्त करण्यात आली आहे.

कारवाई करताना पोलीस
कारवाई करताना पोलीस

मुंबई- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनाने टाळेबंदी लागू केली आहे. मात्र, काही उत्साही नागरिक स्वतःची वाहने घेऊन त्यावर बनावट स्टीकर व बोधचिन्ह वापरून रस्त्यावर येत आहेत, अशा शंभर वाहन चालकांवर पूर्व उपनगरातील विविध पोलीस ठाण्यातील पोलिसांनी दोन दिवसात धडक कारवाई केली.

माहिती देताना पोलीस आयुक्त
मुंबई शहर व उपनगरात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने भीती व चिंतेचे वातावरण पसरले आहे. पण, परिस्थितीचे गांभीर्य नसलेले काही लोक घराबाहेर पडत आहेत. उपनगरातून मुंबई बाहेर जाणाऱ्या वाहनचालकांची वर्दळ पाहता परिमंडळ सहा अंतर्गत विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी करण्यात आली.

दरम्यान, कालपासून पोलिसांनी शंभर वाहनधारकांवर धडक कारवाई केली आहे. तर यात 69 लोकांना अटक करून 50 वाहने जप्त करण्यात आली आहेत. यात ऑटो रिक्षा व चारचाकीचा समावेश आहे. या कारवाईने काही भागातील रस्त्यांवर येणारे अनावश्यक वाहने कमी झाली आहेत, अशी माहिती ट्रोम्बे विभागाचे सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत देसाई यांनी दिली.

हेही वाचा -'असे' ओळखा बनावट सॅनिटायझर्स

ABOUT THE AUTHOR

...view details