महाराष्ट्र

maharashtra

रब्बीतील पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव; शेतकऱ्यांमध्ये धास्ती

By

Published : Dec 19, 2019, 8:12 PM IST

खरिपात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नैसर्गिक संकटामुळे जिल्ह्यातील प्रमुख पीक असणाऱ्या सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. यानंतर नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामेही झाले. मात्र, शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नाही.

influence-of-boll-worm-on-crop-in-latur
रब्बीतील पिकांना लष्करी आळीचा प्रादुर्भाव

लातूर-रब्बीतील पिके ऐन बहरात असतानाच त्यांना लष्करी अळीने घेरले आहे. त्यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होत असून खरिपापाठोपाठ रब्बी हंगामाचे काय होणार? याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. सरासरीपेक्षा अधिकच्या क्षेत्रावर रब्बीचा पेरा झाला असताना हे संकट ओढवले आहे.

हेही वाचा-"मोठा दिपस्तंभ मराठी रंगभूमीला पोरक करून गेला"

खरिपात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नैसर्गिक संकटामुळे जिल्ह्यातील प्रमुख पीक असणाऱ्या सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. यानंतर नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामेही झाले. मात्र, शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नाही. आर्थिक संकटात असतानाही शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पेरणी केली. सध्या रब्बीचा पेरा पूर्ण झाला असून हरभरा आणि ज्वारी पिकांचा पेरा सर्वाधिक आहे. ऐन पीक जोमात असताना आता यावर लष्करी अळींचा प्रादुर्भाव झाला आहे. ह्या अळ्या पीके मुळापासून पोखरून काढत आहेत. जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गावासाने यांच्या निर्देशानुसार पीक पाहणीला अधिकाऱ्यांनी सुरुवात केली आहे. मात्र, शेतकऱ्यांना योग्य उपाययोजनेची प्रतीक्षा आहे.

रब्बीतील पिकांना लष्करी आळीचा प्रादुर्भाव

ABOUT THE AUTHOR

...view details