महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 14, 2019, 4:41 PM IST

ETV Bharat / state

कोल्हापुरातील रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य; काही ठिकाणची वाहतूक सुरळीत

कोल्हापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून पुराचे पाणी जमा झालेले होते. सध्या पुराचे पाणी ओसरत असून, अनेक रस्त्यांवर चिखल साचलेला आहे.

कोल्हापुरातील रस्त्यांवर अजूनही चिखलाचे साम्राज्य

कोल्हापूर - शहरात शिरलेले पुराचे पाणी ओसरले आहे. मात्र, अनेक रस्त्यांवर अजूनही चिखल साचलेला आहे. त्याठिकाणी स्वच्छतेची कामे वेगात सुरू आहेत. दरम्यान, काही ठिकाणचे पाणी पूर्णपणे कमी झाल्याने त्या ठिकाणची वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.

कोल्हापुरातील रस्त्यांवर अजूनही चिखलाचे साम्राज्य
शहरातील महत्त्वाचा चौक म्हणून व्हीनस कॉर्नर या चौकाची ओळख आहे. या चौकात जवळपास 10 ते 15 फूट इतके पाणी साचलेले होते. काही दिवसांपूर्वी या परिसरात बोटी फिरताना पाहायला मिळत होत्या. सध्या या ठिकाणी साचलेले पुराचे पाणी पूर्णपणे ओसरले असून,येथील वाहतूक पूर्ववत झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details