महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 3, 2019, 7:18 PM IST

ETV Bharat / state

मतपत्रिकेवर निवडणूकांची भाजपला भीती; जयंत पाटील यांचा भाजपवर घणाघात

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपने मते मागितली. आमचेच लोक पक्षात घेऊन मते मागत असतील तर, त्यांच्याकडे कोणती नैतिकता राहिली आहे, असा माझा त्यांना प्रश्न आहे.

प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष

कोल्हापूर- ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर मतदान झाले, की आपले अस्तित्व राहणार नाही. महाराष्ट्रात आपली ताकद नाही, त्यामुळे दिसेल त्यांला पक्षात बोलावण्याचा सपाटा भाजपने लावला आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोल्हापूरात केली.

प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष

एका खासगी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपने मते मागितली. आमचेच लोक पक्षात घेऊन मते मागत असतील तर, त्यांच्याकडे कोणती नैतिकता राहिली आहे, असा माझा त्यांना प्रश्न आहे. कोल्हापुरातील काही नेते भाजपच्या वाटेवर आहेत, अशी चर्चा आहे. याबाबद्दल विचारले असता पाटील म्हणाले, नेत्यांना कोणती भीती दाखवली. कोणाच्या मागे कोणती चौकशी लावली, हे दोन वेगळे विषय आहेत. पण, आमच्या पक्षातील कोणी पक्षातून जातील असे मला वाटत नाही. कारण सगळेच नेते माझ्या संपर्कात आहेत.

विधानसभा निवडणुकीपूर्वी मध्यप्रदेशात शिवराजसिंग आणि छत्तीसगडमध्ये रमण सिंग यांनी निवडणुकीपूर्वी अशीच पदयात्रा केली. पण त्या दोघांचेही सरकार पडले. आता, महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यात्रा सुरू आहे. त्यांचे सरकार आता पडणार आहे. न केलेल्या कामांचा उहापोह ते करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता हे कदापिही मान्य करणार नाही. जनतेचा त्यांच्यावर विश्वास उरला नाही. त्यामुळे, आगामी निवडणुकीत आम्ही त्यांचा नक्की पराभव करू, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

ABOUT THE AUTHOR

...view details