महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिवस मतसंग्रामाचा : महाराष्ट्रात पुन्हा फडणवीस सरकारच येईल - धंनजय महाडिक

गेल्या 5 वर्षांत अनेक विकासकामे आणि कल्याणकारी योजना युतीच्या सरकारने राबवल्या. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता पुन्हा युतीचे सरकार निवडेल, असा विश्वास भाजप प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीसाठी मतदान सुरू झाले. त्यात महाडिक यांनीही आपला मतदानाचा अधिकार बजावला. यानंतर ते ईटीव्ही भारतसोबत बोलत होते.

By

Published : Oct 21, 2019, 1:47 PM IST

भाजप प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक

कोल्हापूर - राज्यात पुन्हा एकदा भाजप-सेनेचे सरकार येईल. शिवाय देवेंद्र फडणवीसच पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील, असा ठाम विश्वास भाजप प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले. त्यात महाडिक यांनीही आपला मतदानाचा अधिकार बजावला. यानंतर ते ईटीव्ही भारतसोबत बोलत होते.

हेही वाचा -ठाण्यात मतदानाला सुरुवात, भाजप उमेदवार संजय केळकर अन् जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला हक्क

पुढे बोलताना ते म्हणाले, की गेल्या 5 वर्षांत अनेक विकासकामे आणि कल्याणकारी योजना युतीच्या सरकारने राबवल्या. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता पुन्हा युतीचे सरकार निवडेल. म्हणूनच सकाळपासून सर्वत्र मतदार मतदानासाठी बाहेर पडले आहेत आणि मतदानाला भरभरून प्रतिसाद देत आहेत. दरम्यान, कोल्हापुरात सकाळपासूनच मतदार रांगा लावून मतदान करत आहेत. अनेक ठिकाणी अर्धा किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत.

हेही वाचा -बारामतीत सुप्रिया सुळेंनी बजावला मतदानाचा हक्क

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. विधानसभेच्या २८८ जागा, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. आज राज्यातील तब्बल ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार - 4 कोटी 68 लाख 75 हजार, 750, महिला मतदार - 4 कोटी 28 लाख 43 हजार 635, तृतीयपंथी मतदार- 2 हजार 634 आहेत, दिव्यांग मतदार - 3 लाख 96 हजार आहेत, सर्व्हिस मतदार- 1 लाख 17 हजार 581 आहेत.

हेही वाचा -बारामतीत अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क

या निवडणुकीसाठी राज्यभरात तब्बल 96 हजार 661 मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांवर 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details