जालना - लालबावटा संघटनेच्या मेळाव्यासाठी दुचाकीवरुन जात असताना झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. बुधवारी कुंभार पिंपळगावजवळ ही घटना घडली. भागवत प्रल्हाद हरबक (वय 27) आणि मारिया विनोद लालझरे (वय 32) अशी मृतांची नावे आहेत. त्या दोघांचे प्रेमसंबंध होते अशी चर्चा आहे.
काही महिन्यांपूर्वी हे दोघेही हरवल्याच्या तक्रारी वाळुंज आणि जालना तालुका पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी तपास करून 12 एप्रिलला या दोघांनाही गुजरात येथून ताब्यात घेतले होते. त्यानंतर हे दोघेही चापडगाव येथील आपापल्या घरी राहत होते. बुधवारी दोघे लाल बावटा संघटनेच्या मेळाव्यासाठी दुचाकीवरून निघाले होते.