महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 4, 2020, 5:39 PM IST

ETV Bharat / state

जालन्यात शनिवार पर्यंत कारखाने सुरू होण्याची शक्यता, मात्र मागणीनुसार होणार उत्पादन

काही कंपनी मालकांशी बोलल्यामुळे त्यांच्या अनेक अडचणी समोर आल्या आहेत. त्यामध्ये महत्त्वाची अडचण म्हणजे कामगारांची आहे. स्टील उद्योगांमध्ये काम करणारे बहुतांशी कामगार हे परप्रांतीय होते, ते प्रचंड मेहनत करणारे कामगार होते. मात्र, हे कामगार आपल्या गावी परतल्यामुळे कामगारांचाही मोठा प्रश्न कंपनी समोर आहे.

jalna industrial area
जालना औद्योगिक वसाहत

जालना- जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आजपासून जालना औद्योगिक वसाहतीमधील कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांचा महत्त्वाचा भाग असलेली स्टील इंडस्ट्री ही कदाचित शनिवारी सुरू होण्याची शक्यता आहे. कारण, परवानगी दिल्यानंतर आज बहुतांशी कंपनी मालकांनी औद्योगिक वसाहतींमध्ये जाऊन आपापल्या कारखान्यातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

काही कंपनी मालकांशी बोलल्यामुळे त्यांच्या अनेक अडचणी समोर आल्या आहेत. त्यामध्ये महत्त्वाची अडचण म्हणजे कामगारांची आहे. स्टील उद्योगांमध्ये काम करणारे बहुतांशी कामगार हे परप्रांतीय होते, ते प्रचंड मेहनत करणारे कामगार होते. मात्र, हे कामगार आपल्या गावी परतल्यामुळे कामगारांचाही मोठा प्रश्न कंपनी समोर आहे. तो प्रश्न सोडविल्यानंतर कंपनीमधील उत्पादन झालेला माल हा विकायचा कुठे? हा दुसरा प्रश्न आहे. कारण, ज्यांच्या माध्यमातून हा माल विकला जातो, तिच दुकाने अजून सुरू झालेली नाहीत. त्याचबरोबर, जोपर्यंत बांधकाम सुरू होत नाही तोपर्यंत स्टील उत्पादन करून उपयोग नाही. कारण, दुकानांच्या माध्यमातून हे स्टील विकल्या गेले पाहिजे आणि पहिला साठा संपल्यानंतर दुकानदारांनी दुसऱ्या स्टीलची मागणी केली पाहिजे.

तसेच, लोखंड वितळणाऱ्या भट्ट्या पेटवण्यासाठी दोन-दोन दिवस लागतात आणि या भट्ट्या पेटवल्यानंतर त्यांना सलग लोखंडाचा कच्चामाल पुरवावा लागतो. त्यामुळे, सर्व भट्ट्या एकत्र पेटविणे शक्य नाही. कदाचित शनिवारपर्यंत कंपनी मालक कामगारांचा अंदाज, कंपनीतील निर्जंतुकीकरण, सोशल डिस्टन्स आणि सध्या कंपनीच्या हद्दीत पडलेला कच्चामाल याचा विचार करून २५ ते ३० टक्के उत्पादन सुरू करतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आज कारखाने जरी सुरू झाले असले तरी मालकांनी सर्वच कामगारांना कामावर बोलावले नाही. त्यामुळे, कामावर येणारे कामगार हे देखील संभ्रमात आहेत.

हेही वाचा-बदनापूर नगरपंचायतीकडून 4 नवीन घंटागाड्यांची खरेदी

ABOUT THE AUTHOR

...view details