महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 19, 2019, 5:20 PM IST

Updated : Nov 19, 2019, 6:44 PM IST

ETV Bharat / state

जळगावातील केऱ्हाळा खुर्द येथे दोन महिलांची हत्या; कापसाच्या शेतात आढळले मृतदेह

घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शालूबाई गौतम तायडे (वय 40) आणि नशिबा रुबाब तडवी (45) अशी खून झालेल्या दोन्ही महिलांची नावे आहेत. त्या केऱ्हाळा खुर्द येथील रहिवासी आहेत. मारेकऱ्यांनी दोघांच्या डोक्यावर, छातीवर हत्याराने वार केले आहेत. त्यात अतिप्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

दोन महिलांचा निर्घृण खून

जळगाव- जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील केऱ्हाळा खुर्द येथे दोन महिलांचा निर्घृण खून झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास समोर आली आहे. दोन्ही महिलांचे मृतदेह खेडी शिवारातील एका कापसाच्या शेतात आढळले आहेत.

जळगावातील केऱ्हाळा खुर्द येथे दोन महिलांचा निर्घृण खून

हेही वाचा -दिवे घाटामध्ये दिंडीत घुसला जेसीबी; संत नामदेव महाराजांच्या वंशजासह एक वारकरी ठार

घटनास्थळावरून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शालूबाई गौतम तायडे (वय 40) आणि नशिबा रुबाब तडवी (45) अशी खून झालेल्या दोन्ही महिलांची नावे आहेत. त्या केऱ्हाळा खुर्द येथील रहिवासी आहेत. मारेकऱ्यांनी दोघांच्या डोक्यावर, छातीवर हत्याराने वार केले आहेत. त्यात अतिप्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

शालूबाई आणि नशिबा यांचे मृतदेह दोन वेगवेगळ्या शेतात आढळले आहेत. मात्र, दोन्ही शेत एकमेकांच्या जवळ आहेत. त्यांचा खून का झाला? कोणी केला? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

ही घटना समोर आल्यानंतर केऱ्हाळा खुर्द ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळावर दाखल झाले. त्यानंतर रावेर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा प्राथमिक पंचनामा करण्यात आला आहे. दोन्ही मृतदेह रावेर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. दरम्यान, या घटनेमुळे रावेर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Last Updated : Nov 19, 2019, 6:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details