महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोंडपिपरी तालुक्यातील शेती वन्यजीवांच्या हैदोसामुळे संकटात, शेतकरी चिंतेत

गोंडपिपरी तालुक्यातील शेतात लावलेल्या पिकांवर वन्यजीव तुटून पडल्याने शेतीचे मोठे नुकसान होत आहे. ही बहरलेली पीकं भुईसपाट होत असल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.

By

Published : Oct 7, 2019, 2:14 PM IST

वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे शेतीचे नुकसान

चंद्रपुर -जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील शेती वन्यजीवांच्या हैदोसामुळे संकटात सापडली आहे. कपाशीचे बोंड रानडुकरे मोठ्या प्रमाणात फस्त करत असल्याने शेकडो झाडे भुईसपाट होत आहेत. या प्रकाराने बळीराजाचे मोठे नुकसान होत आहे. तर, शेतात वन्यजीवांचा वावर असल्याने शेतकरी शेतात जायला दचकत आहेत.

वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे शेतीचे नुकसान

जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुका हा वनव्याप्त आहे. त्यामुळे तालुक्यातील बहुतांश शेती जंगलालगत असल्याने वन्यजीवांकडून शेतमालाचे अतोनात नुकसान होत असते. या तालुक्यात गेल्या वर्षाचा तुलनेत यावर्षी कपाशीचे पीक चांगले झाले. मात्र, बहरलेल्या कपाशीसमोर आता वन्यजीवांचे संकट उभे असल्याने शेतकरी चिंतेत आहे.

हेही वाचा - हिराईनगरवासी निर्णयावर ठाम; निवडणुकीवर टाकणार बहिष्कार

बोंडावर आलेल्या कपाशीच्या शेतात रानडुकरे तुटून पडली आहेत. रानडुकरांनी खाल्लेल्या कपाशीच्या बोंडांचा सडा शेतात विखुरला असतानाच शेकडो झाडेही भुईसफाट झाली आहे. यामुळे चांगले बहरलेले पिक डोळ्यादेखत उद्ध्वस्त होताना बघण्याची वेळ बळीराजावर ओढावली आहे. तर, वन्यजीवांकडून हजारो रुपयांच्या शेतपिकाचे नुकसान झालेले असताना वनविभागाकडून मिळणारी मदत तोकडी असल्याने शेतकरी संतप्त आहे. विशेष बाब म्हणजे वन्यजीवांना शेतापासून दूर ठेवण्यासाठी शेतकरी नानाविध उपाययोजना अमलात आणत असतो. तसेच यासाठी हजारो रुपयांची उपकरणे शेतात लावली जातात. मात्र, अद्यापही वन्यजीवांना शेतापासून दूर ठेवण्यात शेतकऱ्याला यश आले नसून पिंकाचे अतोनात नुकसान होत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

हेही वाचा - होय आम्ही भाजपचेच, मग आमची कामे का होत नाहीत? कार्यकर्त्याचा आमदारांना प्रश्न

ABOUT THE AUTHOR

...view details