महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 15, 2019, 7:32 AM IST

Updated : Nov 15, 2019, 7:57 AM IST

ETV Bharat / state

परतीच्या पावसाचा फटका; भाज्यांना महागाईची फोडणी, गृहिणींचे बजेट कोलमडले

किरकोळ बाजारातही भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. आवक घटल्यामुळे फळभाज्यांसह भाजीपाल्याच्या दरात चांगलीच वाढ झाली. त्यामुळे नेहमी कवडीमोल दराने विकला जाणारा फ्लॉवर व कोबीच्या दरातही वाढ झाली आहे.

बुलडाणा पावसामुळे भाजीपाला महागला

बुलडाणा- गेल्या आठवड्यात परतीच्या पावसाने बुलडाणा जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्यानंतर खामगाव, शेगाव, मलकापूर शहरांमध्ये भाजीपाला महागला आहे. दोडका, श्रावण घेवडा या भाज्यांची आवक बंद झाली आहे. पावसाचा फटका सर्वांनाच बसल्याने भाजीपाला उत्पादनाखालील क्षेत्राची पूर्ण काढणी केल्यामुळे भाजीपाल्याची आवक गेल्या चार दिवसांपासून निम्म्याने घटली आहे. त्यामुळे दरात चांगलीच वाढ झाली आहे. यात सर्वात जास्त वाढ पालेभाज्या व ठराविक फळभाज्यांमध्ये झाली आहे.

बुलडाण्यात परतीच्या पावसाने भाजीपाला महागला

हेही वाचा -सत्ता स्थापनेच्या तीन अंकी नाटकावर आमची नजर; भाजप बैठकीनंतर शेलारांचे वक्तव्य

किरकोळ बाजारातही भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. आवक घटल्यामुळे फळभाज्यांसह भाजीपाल्याच्या दरात चांगलीच वाढ झाली. त्यामुळे नेहमी कवडीमोल दराने विकला जाणारा फ्लॉवर व कोबीच्या दरातही वाढ झाली आहे. तर, दोडका, श्रावण घेवडा भाजीची आवकच ठप्प झाली आहे. दहा ते पंधरा रुपये किलो असणाऱ्या काकडीचा दर ५० रुपयांवर पोहोचला आहे. पाहूया एक विशेष वृत्तांत.....

विदर्भासह संपूर्ण राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना हैराण करून सोडले आहे. सोयाबीन पूर्णता हातून गेलेला असून या पावसाचा फटका भाजीपाला उत्पादकांनाही बसला आहे. पावसामुळे उत्पादन घटल्याने आवक घटल्याचा हा परिणाम म्हणून भाजीपाल्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातही पावसाचा परिणाम थेट भाजीपाल्याच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. यामध्ये घाटाखालील भागात सर्वाधिक नुकसान असल्याने किरकोळ बाजारात मेथी ८० रु.किलो, गोबी ८० रुपये किलो, कारले ६० रुपये किलो, वांगे ८० किलो, पालक-आंबडचुका- शेपू ६०रु.किलो, कोथिंबीर २०० किलो, कांदा ८० रु.किलो, काशिफळ ६० रु.किलो, भेंडी १५ ते २० रुपये किलोवरून २० ते २४ रुपये किलो, फ्लॉवर ८ ते १० रुपये किलोवरून १५ ते १८ रुपये किलो झाला आहे. गवार २५ ते ३० रुपये किलोवरून ३० ते ४० रुपये किलो, घेवडा १८ ते २० रुपये किलोवरून ३६ ते ४० रुपये किलो, १८ ते २० रुपये किलो असणारी दोडकी ३२ ते ३४ रुपये किलो झाली आहेत. घाऊक बाजारातच भाज्यांचे दर वाढले असल्याने किरकोळ बाजारात भाज्या खरेदी करताना ग्राहकांना आपला खिसा रिकामा करावा लागत आहे.

हेही वाचा -राज्यात पुन्हा एकदा भाजपचंच सरकार, फडणवीसांनी आमदारांच्या बैठकीत व्यक्त केला विश्वास

भाजीपाल्यांच्या उत्पादनात मोठी घट आल्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.त्याचा परिणाम बाजारपेठेतही दिसू लागला आहे. भाजीपाला उत्पादक शेतकरी सप्टेंबरच्या सुरुवातीला मेथी, कोथिंबीर, वांगी, गोबी, कारले, पालक, आंबडचुका, शेपू, अशा महत्त्वाच्या भाजीपाल्याची लागवड करत असतो. ३० ते ३५ दिवसात हा भाजीपाला विक्रीला उपलब्ध होतो. परंतु भाजीपाला लागवड केल्यानंतर काही दिवसातच पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावणे सुरु केले. संपूर्ण सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आलेल्या या पावसाने भाजीपाल्यांचे उत्पादन बुडाले. परिणामी भाजीपाल्याची तुट बाजारात निर्माण झाली. ज्या शेतकऱ्याकडे भाजीपाला उपलब्ध आहे तो भाजीपालाही पाहिजे त्या दर्जाचा नसल्यामुळे या भाजीपाल्याला व्यापाऱ्यांकडून पाहिजे तो भाव मिळत नाही. परंतु व्यापारी मात्र हा भाजीपाला ग्राहकांना विकताना अव्वाच्यासव्वा दराने देतात. गेल्या काही दिवसांपासून तर भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. आठवडी बाजारात परतीच्या पावसाने भाजी उत्पादकांचे नुकसान केल्यामुळेच भाजीपाल्याचे दर वाढल्याचे शेतकरी सांगत आहेत.

गृहिणींचे बजेट कोलमडले

सध्या कोणत्याही प्रकारची भाजी १०० रुपयांच्या जवळपास दराने विक्री होत असल्याने भाज्यांची खरेदी करताना विचार केला जातो. पाच ते दहा रुपयांमध्ये मिळणारा दुधी भोपळा 30 ते 40 रुपयांवर गेला आहे. अचानक भाववाढ झाल्याने एरवी स्वस्त मिळणार्‍या आठवडी बाजारातील भाज्यांची आवक थांबवल्याने भाज्या प्रचंड महाग झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

Last Updated : Nov 15, 2019, 7:57 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details