महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 9, 2020, 8:27 PM IST

Updated : Sep 9, 2020, 9:44 PM IST

ETV Bharat / state

मराठा समाजाला आरक्षण मिळावं हे सरकारच्या मनातच नव्हतं, आमदार मेटेंचा आरोप

आघाडी सरकारला जर मराठा समाजाविषयी थोडेतरी प्रेम असेल तर त्यांनी मराठा आरक्षण टिकवण्यासाठी अध्यादेश काढावा, अशी मागणी आमदार विनायक मेटे यांनी केली आहे.

आमदार विनायक मेटे
आमदार विनायक मेटे

बीड- मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने तात्पुर्ती स्थगिती दिली आहे. खऱ्या अर्थाने मराठा समाजातील मुला-मुलींसाठी आजचा दिवस हा काळा दिवस आहे. या आघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असे वाटतच नव्हते. अत्यंत निंदनीय ही बाब आहे. अखेर आघाडी सरकारची इच्छा पूर्ण झाली आहे, असा आरोप आमदार विनायक मेटे यांनी केला आहे.

बोलताना आमदार मेटे
मराठा समाजाच्या आरक्षणाला उच्च न्यायालयात तात्पुर्ती स्थगिती देण्यात आली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे म्हणाले, या आघाडी सरकारला मराठा समाजा विषयी थोडे जरी प्रेम असेल तर त्यांनी तत्काळ मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यासाठी अध्यादेश काढावा. एवढेच नाही तर गरज पडल्यास एक दिवसाचे विशेष अधिवेशन घ्यावे व मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी देखील यावेळी आमदार मेटे यांनी केली आहे.

जर मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी अशा प्रकारे अडथळे निर्माण केले जात असतील तर मराठा समाज या आघाडी सरकारला कधीच माफ करणार नाही, असा इशारा देखील आमदार विनायक मेटे यांनी यावेळी दिला आहे.

हेही वाचा -सुदाम मुंडेला परळी न्यायालयाने सुनावली 5 दिवसांची पोलीस कोठडी

Last Updated : Sep 9, 2020, 9:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details