महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मित्रांमध्ये रिक्षात बसण्यावरून झालेल्या वादात एकाचा खून

अंबड येथे कंदुरीच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी निघालेल्या ४ मित्रांमध्ये रिक्षात बसण्याच्या कारणावरून वाद झाला. बाचाबाची दरम्यान एकाने मित्राला धारधार चाकूने भोसकले. यात मोहम्मद असिफ याचा मृत्यु झाला आहे. घटनेनंतर परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता

By

Published : Aug 30, 2019, 4:30 AM IST

मित्रांमध्ये रिक्षात बसण्यावरून झालेल्या वादात एकाचा खून

औरंगाबाद- अंबड येथे कंदुरीच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी निघालेल्या ४ मित्रांमध्ये रिक्षात बसण्याच्या कारणावरून वाद झाला. बाचाबाची दरम्यान एकाने मित्राला धारधार चाकूने भोसकले. यात मोहम्मद असिफ याचा मृत्यु झाला आहे. घटनेनंतर परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला होता

मित्रांमध्ये रिक्षात बसण्यावरून झालेल्या वादात एकाचा खून
अंबड येथील रौनापरांडा येथे कंदुरी खाण्यासाठी 4 मित्र निघाले होते. या वेळी रिक्षात मागे पुढे बसण्याच्या कारणावरून असिफ आणि त्याचे मित्र शेख रेहान शेख पाशु, सोहेल ईब्राहिम, रिक्षा चालक वसीम, शेख रेहान यांच्यात वाद झाला. याच वादातून शेख रेहान शेख पाशु याने त्याच्या जवळच्या धारदार शस्त्राने असिफच्या पोटात व पाठीवर वार केलं. यात त्याची प्राणज्योत मालवली. या प्रकरणी मृत असिफच्या आईनं दिलेल्या फिर्यादीवरून सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details