औरंगाबाद -खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर ( Aurangzeb tomb at Khultabad ) नेहमीच वादात ( Aurangzeb Tomb Controversy ) राहिली. औरंगजेबाने खुलताबाद येथे माझी कबर असावी आणि ते देखील माझ्या कष्टाच्या पैशातून असावी अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार औरंगजेबाचे निधन झाल्यावर त्यांची कबर खुलताबाद येथे हजरत जैनुद्दीन सिरादी यांच्या दर्ग्यात करण्यात आली. अशी माहिती इतिहासतज्ञ संजय पाईकराव यांनी दिली.
खुलताबाद येथे आहेत मुस्लिम संतांच्या दर्गा -खुलताबाद तालुक्याला ऐतिहासिक महत्व आहे. कारण तेथे मुस्लिम संतांच्या दर्गा आहेत. धार्मिक महत्व असलेली पवित्र जागा अशी खुलताबादची ओळख आहे. त्या ठिकाणी बुऱ्हाणुद्दीन ओलिया, हजरत मुलती जिब जरजरी बक्ष आणि औरंगजेबाचे गुरु हजरत जैनुद्दीन सिरादी यांच्या दर्गा आहेत. त्यामुळे ही जागा अतिशय पवित्र मानली जाते. त्यामुळे माझ्या गुरुच्या मला मृत्युनंतर मला दफन करावे अशी इच्छा औरंगजेब यांची होती. नगर जिल्ह्यातील भिंगार येथे 1707 मध्ये त्यांच्या मृत्यू नंतर त्यांना खुलताबाद येथे दफन करून कबर उभारण्यात आली होती. अशी माहिती इतिहासतज्ञ संजय पाईकराव यांनी दिली.