महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रियकराचा लग्नास नकार; २१ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

प्रेमप्रकरणातून मुलाने लग्नास नकार दिल्याने, २१ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावती  जिल्ह्यातील परतवाडा येथे घडली. या प्रकरणी परतवाडा पोलीस ठाण्यामध्ये मुलगा आणि त्याच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

By

Published : Jun 4, 2019, 2:49 PM IST

Updated : Jun 4, 2019, 4:25 PM IST

परतवाडा पोलीस स्टेशन

अमरावती- प्रेमप्रकरणातून मुलाने लग्नास नकार दिल्याने, २१ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे घडली. या प्रकरणी परतवाडा पोलीस ठाण्यामध्ये मुलगा आणि त्याच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

प्रियकराचा लग्नास नकार; २१ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

याबाबत सविस्तर माहिती अशी, की परतवाडा येथील २१ वर्षीय तरुणीचे, ऋषी मिश्रा या तरुणासोबत प्रेमप्रकरण होते. या प्रकरणातून दोघांनी लग्न करण्यासाठी घरातून पळ काढला. नंतर काही दिवसांनी ऋषीने मुलीला परत तिच्या घरी आणून सोडले. तेव्हा मुलीने ऋषीकडे लग्नाचा तगादा लावला. याकारणाने ऋषीने तिला तुझी बदनामी करेन, अशी धमकी दिली.

तेव्हा निराश झालेल्या मुलीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यासंदर्भात मुलीच्या वडिलांनी परतवाडा पोलीस ठाण्यामध्ये ऋषी मिश्रा आणि त्याचे वडिल कबीर मिश्रा याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

Last Updated : Jun 4, 2019, 4:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details