महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोर्शी तालुक्यात तीव्र पाणीटंचाई; पाण्यामुळे शेजार धर्मात वाढला कलह

गोराळा गावात दोन विंधन विहिरी होत्या, पण भूगर्भातीलच पाण्याची पातळी खोल गेल्याने या विंधन विहिरींमध्ये पाणी नाही. यामुळे ग्रामपंचायतीने दोन विहिरी अधिग्रहित केल्या असून त्यावरूनच गावाला हा पाणीपुरवठा होत आहे.

By

Published : May 10, 2019, 3:10 PM IST

मोर्शी तालुक्यात तीव्र पाणीटंचाई; पाण्यामुळे शेजार धर्मात वाढला कलह

अमरावती - मोर्शी महामार्गावर पिंगळादेवी गडाच्या पायथ्याशी असलेल्या मोर्शी तालुक्यातील गोराळा गावात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शेजार धर्म निभावणाऱ्या महिला आज एकमेकींविरोधात पाण्यासाठी नळावर भांडताना पाहायला मिळत आहेत. गावात सात दिवसांच्या अंतराने पाणी पुरवठा होतो. जनावरांना पाणी प्यायला मिळावे म्हणून येथील शेतकरी गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या नांदुरा गावात दिवसातून दोन वेळा जनावरांना पाणी पाजण्यासाठी नेतात.

मोर्शी तालुक्यात तीव्र पाणीटंचाई; पाण्यामुळे शेजार धर्मात वाढला कलह

मोर्शीच्या अप्पर वर्धा धरणातून जाणाऱ्या पाईपलाईनच्या ओवरफ्लोवर सकाळपासूनच येथील नागरिकांची पाण्यासाठी गर्दी दिसते. त्यातही ते पाणी गढूळ असल्याच्या महिलांच्या तक्रारी आहे. गावात सात दिवसानंतर पाणी येते. भरून ठेवलेले पाणी तीन दिवसातच संपते. त्यामुळे पाण्यासाठी महिलांना पुन्हा संघर्ष करावा लागत आहे.

या गावात दोन विंधन विहिरी होत्या, पण भूगर्भातीलच पाण्याची पातळी खोल गेल्याने या विंधन विहिरींमध्ये पाणी नाही. यामुळे ग्रामपंचायतीने दोन विहिरी अधिग्रहित केल्या असून त्यावरूनच गावाला हा पाणीपुरवठा होत आहे. गावाकाठी असलेल्या अंगणवाडीतील नळावर माहिलांची मोठी गर्दी ही पाणी भरण्यासाठी दिसते. पाण्याच्या टंचाईमुळे महिलांमध्ये पाणी मिळवण्यासाठी संघर्ष होत आहे. यातूनच त्यांच्यामध्ये भांडणही निर्माण होत आहे.

महिन्यापूर्वी एका खासगी कंत्राटदाराकडून एका टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. कंत्राटदाराने खोदलेल्या विंधन विहिरीला पाणी नसल्याने तो टँकर बंद झाला. गावाशेजारी एक किलोमीटरवर असलेल्या व खूप कमी पाणी असलेल्या विहिरीवरून महिलांना पाणी आणावे लागत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details