महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नांदगाव खंडेश्वरमध्ये शिवशाही बसच्या चाकातून धूर, जीवितहानी टळली

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने वातानुकूलित व अत्याधुनिक बस म्हणून शिवशाही या बसेस प्रवाशांच्या सेवेत आणल्या. मात्र, या बसेस सुरूवातीपासूनच वादग्रस्त व अपघातग्रस्त ठरत आहेत. अमरावतीतील नांदगाव खंडेश्वर बसस्थानकाजवळ शिवशाही बसच्या एका चाकातून धूर निघताच प्रवाशांनी बसमधून बाहेर पळ काढला. त्यामुळे पुन्हा एकदा या शिवशाही बसेस चर्चेत आल्या आहेत.

By

Published : May 9, 2019, 11:48 AM IST

शिवशाही बसच्या चाकातुन निघाला धूर

अमरावती - महाराष्ट्र परिवहन महामंडळाने सुरू केलेल्या शिवशाही या वातानुकूलित बसचे अपघात सत्र सुरूच आहे. ही बस नेहमीच कोणत्या कोणत्या कारणामुळे प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. दरम्यान, नांदगाव खंडेश्वर बसस्थानकातही असाच एक अपघाती प्रसंग समोर आला आहे.

शिवशाही बसच्या चाकातुन निघाला धूर

या बसस्थानकामध्ये शिवशाही बसच्या एका चाकाला आग लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी जीव मुठीत धरून बस बाहेर पळ काढला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना बुधवारी दुपारी घडली. शॉटसर्कीटमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे.

यवतमाळ येथून अमरावतीकडे एक शिवशाही बस नांदगाववरून जात होती. दरम्यान खंडेश्वर बसस्थानकाजवळ बसच्या एका चाकातून धूर निघत होता. दरम्यान, वेळीच प्रवाशांनी आरडाओरड केल्याने चालकाने बस बाजूला थांबवली आणि सर्व प्रवासी सुखरुप बाहेर आले. त्यानंतर तत्काळ पाण्याचा वापर करून ही आग आटोक्यात आणण्यात आली.

एसीमुळे ही बस आतून थंड असली तरी उष्णतेमुळे बसने पेट घेतला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त शिवशाहीने पेट घेतला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details