अमरावती :लॉकडाऊनच्या काळात आपण न दिसणाऱ्या कोरोना विषाणूसाठी बंद ठेवला होता. मात्र, आता या केंद्र सरकारच्या दिसणाऱ्या अतिरेकाविरोधात बंद पुकारण्यात आला आहे. केंद्र सरकारची सध्याची भूमीका ही एखाद्या डाकूप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे एखादा डाकू कोणाला लुटून, त्याला ठार करुन निघून जातो; त्याप्रमाणेच केंद्र सध्या शेतकऱ्यांना लुटत आहे अशी टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली.
भारत बंदमध्ये सहभागी झालेल्यांना सलाम..
केंद्र सरकारविरोधात देशभरातील शेतकरी संघटनांनी काल (८ डिसेंबर) भारत बंदची हाक दिली होती. शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी ज्या लोकांनी या बंदमध्ये उस्फूर्त सहभाग नोंदवला, त्या सर्वांना माझा सलाम आणि मानाचा मुजरा असे बच्चू कडू म्हणाले.