महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धरण उशाला कोरड घशाला...! अमरावतीत पाणी टंचाई

अमरावती नागपूर मार्गावर रतन इंडिया औष्णिक वीज प्रकल्प आहे. या प्रकल्पाला अमरावती शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्परवर्धा धरणातून पुरवठा केला जातो. २००५ मध्ये हा प्रकल्प करण्यात आला. या प्रकल्पाच्या निर्मितीच्या एक वर्ष आधी २००४ साली वाघोली नाल्यालगतच्या मोकळ्या जमिनीवर शासनाने तलावाची निर्मिती केली.

By

Published : Apr 25, 2019, 12:26 PM IST

वाघोली तलाव

अमरावती - सर्वत्र भीषण पाणी संकट घोंघावत आहे. अमरावतीही याला अपवाद नाही. अमरावती जिल्ह्यात दुष्काळामुळे पाण्याची टंचाई जाणवत आहे. अशात शहरापासून केवळ ३० किमी अंतरावर असलेला वाघोली तलाव मात्र पाण्याने तुडुंब भरलेला आहे. पण, यातील पाणी शहरात आणणे शक्य होत नाही.

प्रतिक्रिया देताना नागरिक

अमरावती नागपूर मार्गावर रतन इंडिया औष्णिक वीज प्रकल्प आहे. या प्रकल्पाला अमरावती शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्परवर्धा धरणातून पुरवठा केला जातो. २००५ मध्ये हा प्रकल्प करण्यात आला. या प्रकल्पाच्या निर्मितीच्या एक वर्ष आधी २००४ साली वाघोली नाल्यालगतच्या मोकळ्या जमिनीवर शासनाने तलावाची निर्मिती केली. तलवातून वाघोलीच्या दिशेने कालवा काढला. मात्र, तलाव खोलगट भागात आहे. येथील पाणी उंच भागात नेणे शक्य होत नाही.

आज अमरावती शहरातील वडाळी आणि छत्री तलाव आटण्याच्या मार्गावर आहे. या तालावलागतच्या परिसरातील विहिरी आटल्या आहेत. शहरालगतच्या जंगलातील पाणवठ्यांची परिस्थितीही बिकट आहे. असे असताना वाघोली तलावात बऱ्यापैकी जलसाठा आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार औष्णिक वीज प्रकल्पातील खराब पाणी तलावात सोडले जात असल्याने तलावाची जल पातळी भरलेली दिसते. या तलावातील पाण्यामुळे लगतच्या शेतातील विहिरींना पाण्याचे झरे मोठ्या प्रमाणात लागले आहे. शेतीला या तलावातील पाण्याचा वापर केला जातो, असे या भागातील शेतकरी म्हणतात.

ABOUT THE AUTHOR

...view details