महाराष्ट्र

maharashtra

विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाविनाच शाळा झाल्या सुरू...

By

Published : Jun 26, 2020, 10:40 AM IST

दोन महिन्याच्या सुट्ट्यानंतर एकत्र येणाऱ्या मित्रांची मज्जा काही औरच अनुभवायला मिळते. नव्या शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला प्रत्येक शाळांमध्ये पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाते. शाळेच्या नव्या युनिफॉर्ममध्ये टवटवीत चेहऱ्यांचे विद्यार्थी अगदी आनंदात शाळेत येताना दिसतात. मात्र, यंदा 26 जूनला शाळा सुरू झाल्या खऱ्या परंतु विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाविनाच.

शाळा
शाळा

अमरावती - महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असून परिस्थिती गंभीर होत चालली आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोरोनाचे संकट पूर्णतः टळल्याशिवाय अमरावती शहर आणि जिल्ह्यातील शाळांमध्ये विद्यार्थी येणार नाही, अशी परिस्थिती आहे. खरंतर 26 जूनला दरवर्षी अमरावती शहरातील प्रत्येक शाळेसमोर विद्यार्थी आणि पालकांची गर्दी पाहायला मिळते. शाळेच्या नव्या युनिफॉर्ममध्ये टवटवीत चेहऱ्यांचे विद्यार्थी अगदी आनंदात शाळेत येताना दिसतात. मात्र, यंदा 26 जूनला शाळा सुरू झाल्या खऱ्या मात्र त्या विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाविनाच.

दोन महिन्याच्या सुट्ट्यानंतर एकत्र येणाऱ्या मित्रांची मज्जा काही औरच अनुभवायला मिळते. नव्या शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीला प्रत्येक शाळांमध्ये पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाते. अनेक शाळांमध्ये या स्वागत सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून मान्यवरांना बोलविले जाते. विद्यार्थ्यां सोबतच शिक्षकांमध्ये ही नवा उत्साह पाहायला मिळतो. कोरोनामुळे मात्र शाळेचा पहिला दिवस यावर्षी पहिल्यांदा निरुत्साही असल्याचे अमरावती शहरातील शाळांसमोर पहायला मिळाले. कोरोनाचे संकट कायम असल्यामुळे शाळा कधी उघडणार हे अनिश्चित आहे.

शाळेच्या पहिल्या दिवशी आज शाळेतील सर्व शिक्षकांना बोलविण्यात आले आहे. शिक्षकांची बैठक शाळेमध्ये होणार असून प्रत्येक शाळेत या बैठकीची वेगवेगळी वेळ ठरली आहे. शाळा व्यवस्थापन आधी शिक्षकांची बैठक घेणार असून यानंतर पालक प्रतिनिधींची बैठक घेतली जाणार आहे. कोरोनामुळे परिस्थिती नाजूक आहे. अशा या संकटाच्या परिस्थितीत नव्या शैक्षणिक सत्राची सुरुवात कशा पद्धतीने करावी यासंदर्भात पालकांचे मत जाणून घेतले जाणार आहे.

विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी नेमक्या कुठल्या उपाययोजना केल्या जाव्यात या संदर्भात शिक्षक आणि पालक निश्चीतपणे मार्ग काढतील अशी अपेक्षा वाटत आहे. शिक्षकांकडून पालकांना मार्गदर्शन केले जाणार असून विद्यार्थ्यांना शिकवण्याची जबाबदारी आता शिक्षकांसोबतच पालकांवरही अधिक असणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details