महाराष्ट्र

maharashtra

वान प्रकल्पाचे चार दरवाजे उघडले; 7 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग

By

Published : Sep 21, 2019, 8:45 PM IST

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तेल्हारा तालुक्यातील वान धरण शंभर टक्के भरले आहे. धरणाचे चार दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडले असून, 7 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

वान धरण

अकोला - तेल्हारा तालुक्यातील वान धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे शनिवारी पहाटे चार दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडण्यात आले. धरणातून 7 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

वान धरणाचे चार दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडले असून, 7 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू


मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वान धरण भरले. मेळघाटचे जंगल आणि लगतच्या परिसरातील पाणी वान धरणाला येऊन मिळते. काही दिवसांपूर्वी धरणाचे दोन दरवाजे उघडले होते. मात्र, मागील 24 तासात वान धरणाच्या पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने आणखी चार दरवाजे उघडण्यात आले.

हेही वाचा - अप्पर वर्धा तुडूंब, धरणाचे 9 दरवाजे उघडले


वान नदी काठच्या 17 गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, पुन्हा पाऊस पडल्यास धरणाचे आणखी दरवाजे उघडण्यात येतील, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चिन्मय वाकोडे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details