अहमदनगर - शहरातील जवळपास १२८ तृतीयपंथीयांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला. तसेच त्यांनी ज्या कोणत्या पक्षाचे सरकार येईल त्यांनी आम्हाला आरक्षण द्यावे, अशी मागणीही केली.
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात आज निवडणूक पार पडत आहे. त्यामुळे आज शहरातील तृतीयपंथीयांनी मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी तृतीयपंथी संघटनेच्या पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्त्या काजल गुरू यांनी सांगितले, की आम्ही लोकशाहीचा आदर ठेवत मतदान केले असून इतरांनीही मतदान करावे, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
उमेदवार निवडणुकीत जी आश्वासने देतो ती त्याने निवडून आल्यावर पूर्ण करावीत, अशी अपेक्षा आम्हाला आहे. तसेच सरकार कुणाचेही निवडून येवो, आम्हाला मात्र येणाऱ्या सरकारकडून आरक्षण हवे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.