महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आमदार काळे यांनी 400 विधवा महिलांना केली प्रत्येकी एकवीसशे रुपयांची मदत

कोरोनामुळे घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यावर आर्थिक संकटात सापडलेल्या महिलांना कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी आधार देत भाऊबीजेची भेट दिली आहे. रक्षाबंधनच्या दिवशी या महिलांनी बांधलेल्या राखीच्या बदल्यात कोपरगाव तालुक्यातील तब्बल 400 महिलांना स्वतःचे तीन महिन्याचे मानधन, असे प्रत्येकी 2 हजार 100 रुपयांची आर्थिक मदत देऊ केली आहे.

By

Published : Nov 2, 2021, 9:33 PM IST

छायाचित्र
छायाचित्र

अहमदनगर - कोरोनामुळे घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यावर आर्थिक संकटात सापडलेल्या महिलांना कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी आधार देत भाऊबीजेची भेट दिली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी या महिलांनी बांधलेल्या राखीच्या बदल्यात कोपरगाव तालुक्यातील तब्बल 400 महिलांना स्वतःचे तीन महिन्याचे मानधन, असे प्रत्येकी 2 हजार 100 रुपयांची आर्थिक मदत देऊ केली आहे.

बोलाताना आमदार काळे व संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बानायत

कोपरगाव तालुक्यातील निराधार झालेल्या अनेक महिलांनी राखी पौर्णिमेला आमदार आशुतोष काळे यांना राखी बांधून मदतीचे आवाहन केले होते. निराधार महिलांनी बांधलेल्या धाग्याची जाणीव ठेवत आशुतोष काळे यांनी आज (दि. 2 नोव्हेंबर) दीपावलीच्या पार्श्वभूमीवर या महिलांना भाऊबीजेची भेट दिली. साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायात यांच्या उपस्थितीत 400 महिलांना आपल्या आमदारकीच्या मानधनातून प्रत्येकी 2 हजार 100 रुपयांची आर्थिक मदत देऊ केली आहे.

साईबाबा संस्थानच्या माध्यमातून निराधार महिलांना आवश्यक ती मदत देण्याचे आश्वासन संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी यावेळी दिले. राज्य सरकारने राज्यातील महिलांना मदत जाहीर केली असली तरी आपल्या मतदारसंघात कोरोनामुळे निराधार झालेल्या महिलांना आपल्या मानधनातून काळे यांनी मदत केली आहे. राज्यातील इतर आमदारांनी असेच पाऊल उचलले तर राज्यातील निराधार झालेल्या महिलांना थोडा का होईना आधार मिळेल.

हे ही वाचा -साई दर्शनाच्या पासचा काळाबाजार; साई संस्थानकडून कारवाई सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details