महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निवडणूक जाहीर होताच भाजप-सेनेला गळती सुरु

ज्येष्ठ साहित्यिक व सेवानिवृत्त जिल्हा परिषदेचे उपमुख्य अधिकारी लहू कानडे यांनी आज शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते त्यांच्या पक्षप्रवेश झाला. हा पक्षप्रवेश सोहळा संगमनेर येथे पार पडला.

By

Published : Sep 22, 2019, 1:58 PM IST

थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षप्रवेश होतानाचे दृश्य

अहमदनगर- निवडणूक जाहीर होताच भाजप-सेना युतीला मोठा धक्का बसला आहे. मात्र जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाला या गळतीचा मोठा फायदा झाला आहे. काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झाली आहे. इगतपुरी आणि श्रीरामपूरमधून अनेकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. ज्येष्ठ साहित्यिक लहू कानडे यांनी आज प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे.

काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर प्रतिक्रिया दताना ज्येष्ठ साहित्यिक लहू कानडे

ज्येष्ठ साहित्यिक व सेवानिवृत्त जिल्हा परिषदेचे उपमुख्य अधिकारी लहू कानडे यांनी आज शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते त्यांच्या पक्षप्रवेश झाला. हा पक्षप्रवेश सोहळा संगमनेर येथे पार पडला. कानडे यांनी २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून निवडणूक लढविली होती. त्यात ते पराभूत झाले होते. मात्र त्यांना ३८ हजार एवढी मते मिळाली होती. गेली पाच वर्षे ते शिवसेनेत होते. त्यांनी लोकसभेचीही उमेदवारी मागितली होती. मात्र शिवसेनेने त्यांच्या ऐवजी खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी दिली होती.

त्यांनी सेनेचे काम केले. विधानसभा निवडणुकीत श्रीरामपूर मतदार संघातून त्यांना उमेदवारी देण्याचा शब्द देण्यात आला होता. मात्र ऐनवेळी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला. दरम्यान त्यांची उमेदवारीही निश्चित झाली आहे. त्यामुळे कानडे नाराज झाले आहे. मात्र त्यांच्या संपर्कात काँग्रेसचे नेते होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर त्यांची बैठक झाली. ही बैठक संगमनेर येथे थोरात यांच्या निवासस्थानी झाला होती. या बैठकी दरम्यान त्यांचा पक्ष प्रवेश करण्यात आला.

हेही वाचा-खासदार सुजय विखेंच्या शिष्टाईनंतर नामदेव राऊतांचे बंड थंड; राम शिंदेंचा करणार प्रचार

याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, काँग्रेसला मोठी जुनी परंपरा असून काँग्रेस पक्ष हा लोकशाही मजबूत करणारा पक्ष आहे. काँग्रेस पक्ष नागरिकांना विकासा समवेत घेऊन चालणारा पक्ष आहे. सर्वसामान्यांसाठी शाश्वत विकासाची परंपरा असलेला हा पक्ष आहे. विद्यमान भाजप-सेना सरकारने फक्त जाहिरातबाजी केली असून जनतेला फसवले आहे.

हेही वाचा-समाजस्वास्थ बिघडवणाऱ्या भाजपला 'चले जाव' म्हणायची वेळ - शरद पवार

वाढती बेरोजगारी, आर्थिक मंदी, ढासळलेली अर्थव्यवस्था, अडचणीत आलेला शेतकरी, वाढलेली महागाई या सर्व समस्या घेऊन काँग्रेस पक्ष लढत आहे. त्याचबरोबर, आगामी काळामध्ये काँग्रेसचे सरकार येईल असा विश्वास व्यक्त करत येत्या काळात भाजप व सेनेमधून अनेक नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे ते म्हणाले.

...या लोकांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वरमधील अनेक शिवसेना कार्यकर्त्यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नाशिक जिल्ह्याचे अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्ष शरदराव आहेर, जळगाव जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील, संपतराव सकाळे, उपाध्यक्ष उत्तमराव भोसले, मधुकर लांडे, रामदास धांडे सभापती गोपाळा लहांगे यांनी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर जिल्हा परिषद सदस्य हिरामण खोतकर, भारताताई भोये, मोतीराम दिवे, कैलास बेनकुळे, प्रशांत बाविस्कर, (त्र्यबकेश्‍वर) हे राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये दाखल झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details