महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

गोदावरी नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग संध्याकाळपर्यंत वाढणार असल्याने कोपरगाव आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगावात तातडीने बैठक घेतली.

By

Published : Aug 4, 2019, 5:06 PM IST

गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

अहमदनगर- गेल्या 2 दिवसात सह्याद्रीच्या रांगेमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे त्रंबकेश्वरजवळ उगम पावणाऱ्या गोदावरी नदीला पूर आला आहे. तसेच मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीपात्रात रविवारी 1 लाख 30 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्याबरोबरच संध्याकाळपर्यंत पाण्याचा विसर्ग वाढणार असल्याने कोपरगाव आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीकाठील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

स्नेहलता कोल्हे, आमदार

गोदावरी नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग संध्याकाळपर्यंत वाढणार असल्याने कोपरगाव आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि आमदार स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगावात तातडीने बैठक घेतली.

कोपरगाव शहरालगत असलेल्या गोदावरी नदीच्या पूराचे पाणी शहरात घुसणार असल्याने शहरातील हनुमान नगर, जिजामाता नगर आणि इतर भागातील 100 कुटुंबीयांना सुरक्षित स्थळी हलवण्यास आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी आणि शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी सुरूवात केली आहे, अशी माहिती कोपरगावच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांनी दिली.

गोदावरी नदीत रात्रीपर्यंत 2 लाख क्युसेक्सने पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने उपाययोजना सुरु केली आहे. तसेच कोपरगाव शहरातील लहान पूल पाण्यात गेल्यामुळे लहान पूलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details