दिल्ली- जगभरासह देशात कोरोनाच्या संसंर्गामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे राजधानी नवी दिल्ली येथे मे आणि जून महिन्यात दोन टप्प्यात होणारी विश्वचषक नेमबाजी स्पर्धा अखेर रद्द करण्यात आली. सर्वाच्या आरोग्याचे हित जपण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
विश्वचषक नेमबाजी स्पर्धा सुरूवातील १५ ते २६ मार्चदरम्यान आयोजित करण्यात आली होती. पण स्पर्धेला सुरुवात होण्याच्या चार दिवसआधी कोरोनामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे रायफल आणि पिस्तूल प्रकाराची ही स्पर्धा ५ ते १३ मे दरम्यान आणि शॉटगन प्रकाराची स्पर्धा २ ते ९ जून दरम्यान होणार होती. पण, सद्य परिस्थिती पाहता एनआरएआयने स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला.