मोहाली : भारत विरुद्ध श्रीलंका संघात कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ शनिवार पार पडला. भारतीय संघाने रविंद्र जडेजाच्या शानदार दीड शतकाच्या ( Ravindra Jadeja century ) जोरावर आपला पहिला 8 बाद 574 धावांवर घोषित केला. ज्यानंतर श्रीलंका संघाने दुसऱ्या दिवसाच्या अखेर पर्यंत 4 बाद 108 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर रविंद्र जडेजाने आपल्या शानदार खेळीबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा ( All-rounder Ravindra Jadeja ) शनिवारी म्हणाला, त्याने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी शांत राहून सामान्यपणे फलंदाजी केली. जडेजाने 175 ही त्याची सर्वोच्च कसोटी धावसंख्या बनवली. त्यानंतर भारताने 129.2 षटकात 574/8 या प्रचंड धावसंख्येवर आपला पहिला डाव घोषित केला. जडेजा म्हणाला, "खूप छान वाटत आहे. काल ऋषभ खूप चांगला खेळत होता. तो गोलंदाजांवर हल्ला करत होता, त्यामुळे मी नॉन-स्ट्रायक एंडवर उभा राहून त्याच्या फलंदाजीचा आनंद घेत होतो."