महाराष्ट्र

maharashtra

पाकच्या गोलंदाजांनी टाकले तब्बल २१ नो बॉल.. पंचांचे दुर्लक्ष, मग काय आयसीसीने घेतला 'हा' निर्णय

By

Published : Nov 25, 2019, 6:13 PM IST

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नो बॉलवर लक्ष ठेवण्याचे काम मैदानातील पंच करत असत. मात्र आता नो बॉलवर लक्ष ठेवण्याचे काम तिसरे पंच (Tv Umpire) करणार आहेत. या संदर्भातचा प्रस्ताव आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ठेवला होता. त्या प्रस्तावाची चाचपणी भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यातील मालिकेत करण्यात येणार आहे.

पाकच्या गोलंदाजांनी टाकले २१ नो बॉल पण पंचांनी दिलं नाही लक्ष, मग काय आयसीसीने घेतला 'हा' निर्णय

मुंबई- ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात ब्रिस्बेन येथे झालेल्या कसोटी सामन्यात गोलंदाजांनी दुसऱ्या दिवशी तब्बल २१ चेंडू नो बॉल टाकले. मात्र, याकडे पंचानी लक्ष दिले नाही. या कारणाने मैदानातील पंचाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील सुरू होणाऱ्या मालिकेत पंचांच्या बाबतीत मोठा बदल करण्याचा निर्णय आयसीसीने घेतला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नो बॉलवर लक्ष ठेवण्याचे काम मैदानातील पंच करत असत. मात्र आता नो बॉलवर लक्ष ठेवण्याचे काम तिसरे पंच (Tv Umpire) करणार आहेत. या संदर्भातचा प्रस्ताव आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ठेवला होता. त्या प्रस्तावाची चाचपणी भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यातील मालिकेत करण्यात येणार आहे.

भारत आणि वेस्ट इंडीज संघात ६ डिसेंबरपासून ३ सामन्यांची टी-२० मालिका सुरू होणार आहे. या मालिकेनंतर उभय संघात ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या दोनही मालिकेत नो बॉलचा निर्णय तिसरे पंच देतील. ही सुरूवात प्रायोगिक तत्वावर करण्यात आली आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत गोलंदाजांनी २१ चेंडू नो बॉल टाकले. मात्र, याकडे पंचानी लक्ष दिले नाही. यात सर्वात जास्त नो बॉल पाकिस्तानचा १६ वर्षीय युवा गोलंदाज नसीम शाहने टाकले आहेत. महत्वाची बाब म्हणजे, पंचाच्या या चूकीमुळे ऑस्ट्रेलियाला त्या चेंडूवर धावा मिळाल्या नाहीत.

हेही वाचा -विराट म्हणतो, 'या' खेळाडूला पकडणं 'मुमकिन ही नही नामुमकिन'

हेही वाचा -बॅडमिंटनपटू साई प्रणीतचा पार पडला साखरपुडा, ८ डिसेंबरला होणार लग्न

ABOUT THE AUTHOR

...view details