महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

'या' विश्वचषक स्पर्धेला भारतीय क्रिकेट चाहते कधीच विसरणार नाहीत, खेळाडूंना घरी पोहोचणेही झाले होते मुश्किल..

संपूर्ण देशात भारताच्या संघाविरुद्ध मोठा संताप निर्माण झाला होता. जागोजागी खेळाडूंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले जात होते.

जागोजागी भारतीय खेळाडूंच्या पुतळ्याचे दहन केले जात होते

By

Published : May 24, 2019, 9:26 PM IST

नवी दिल्ली - २००७ च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व हे राहुल द्रविडच्या हातात होते. ही विश्वचषक स्पर्धा भारतीय क्रिकेट आणि चाहत्यांसाठी एका वाईट स्वप्नापेक्षा कमी नव्हता. या स्पर्धेत भारत आपल्या गटात बांगलादेश आणि श्रीलंका यांच्याविरुद्ध धक्कादायकरित्या पराभूत होऊन विश्वचषकातून बाहेर पडला होता. या विश्वचषक स्पर्धेत भारतासारखा मोठा संघ सुपर ८ चा टप्पाही पार करू शकला नव्हता. भारतीय क्रिकेट संघाचा हा लाजिरवाणा पराभव भारतीय चाहत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता.

संपूर्ण देशात भारताच्या संघाविरुद्ध मोठा संताप निर्माण झाला होता

संपूर्ण देशात भारताच्या संघाविरुद्ध मोठा संताप निर्माण झाला होता. जागोजागी खेळाडूंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले जात होते. त्यामुळे वेस्ट इंडीजवरुन दिल्ली एयरपोर्टवर आलेल्या भारतीय खेळाडूंना घरी पोहचणेही मुश्कील झाले होते. मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर येऊन भारतीय संघाचा विरोध करू लागले होते. परिस्थिती एवढी गंभीर झाली होती की, खेळाडूंच्या सुरक्षिततेत मोठ्या प्रमाणात वाढ करावी लागली होती.

सचिन तेंडुलकर

सुरक्षिततेच्या कारणास्तव धोनीला त्यावेळी पोलिसांच्या गाडीमधून घरी नेण्यात आले होते. त्यानंतर खुद्द धोनीने एका कार्यक्रमात सांगितले होते की 'या पराभवानंतर मला आंतकवादी असल्यासारखे वाटत होते. या पराभवानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही निवृत्तीचा विचार पक्का केला होता. मात्र त्याचा भाऊ अजितने त्याला समजावले आणि २०११ च्या विश्वचषकाचा विचार करण्यास भाग पाडले.

धोनी

२००७ विश्वचषकाच्या कटू आठवणीनंतर २०११ मध्ये भारताने शानदार कमबॅक करत मुंबईच्या वानखेडे मैदानावर दुसऱ्यांदा जगज्जेता बनण्याचा मान मिळवला होता

ABOUT THE AUTHOR

...view details