मुंबई- सध्याच्या घडीला संपूर्ण देश २१ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. या परिस्थितीमध्ये आर्थिक दुर्बल घटकांची चिंता वाढली आहे. कारण त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या मदतीसाठी भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंग सरसावला आहे. हरभजनने ५ हजार कुटुंबियांना अन्न-धान्य पुरवले. याची माहिती त्याने त्यांच्या ट्विटवरुन दिली.
हरभजनने ट्विटमधून सांगितले की, 'सध्याच्या घडीला काही कुटुंबियाला अन्नधान्याचा प्रश्न भेडसावत आहे. या गरजू लोकांना मदत करण्यासाठी मी आणि पत्नी गीता यांनी पुढाकार घेतला आहे. आज जालंधर येथील पाच हजार लोकांना अन्नधान्य पुरवले आहे. यापुढेही असे काम करण्याची ताकद मला मिळो, हीच प्रार्थना.'