महाराष्ट्र

maharashtra

वीरमरण आलेल्या जवानांच्या मदतीला धावली बीसीसीआय

By

Published : Feb 17, 2019, 6:36 PM IST

दोन दिवसांपूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने देखील मदतीचा हात पुढे केला आहे. वीरमरण आलेल्या जवानांच्या मुलांना शैक्षणिक मदत करणार असल्याची माहिती त्याने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

बीसीसीआय

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० पेक्षा जास्त जवानांना वीरमरण आले. या घटनेनंतर समाजातील प्रत्येक जण आपापल्यापरीने हुतात्मा जवानांच्या परिवारास मदत करत आहे.

भारतातील सर्वात मोठे बोर्ड अर्थात बीसीसीआय देखील पुढे आली आहे. बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष सी.के.खन्ना यांनी वीरमरण आलेल्या जवानाच्या परिवारास मदत म्हणून ५ कोटींची मदत देण्यासंबंधी प्रशासकीय समितीला विनंती पत्र लिहिले आहे.

दोन दिवसांपूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने देखील मदतीचा हात पुढे केला आहे. वीरमरण आलेल्या जवानांच्या मुलांना शैक्षणिक मदत करणार असल्याची माहिती त्याने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details