मुंबई - बिग बॉस १४ च्या शोमधून अलिकडे काही स्पर्धक बाहेर पडले होते. त्यानंतर सलमान खानने तीन नवीन स्पर्धकांना वाईल्ड कार्ड एन्ट्री दिली आहे. कविता कौशिक, नैना सिंह आणि शार्दुल पंडित यांनी आता बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे.
बिग बॉसने स्पर्धकांना ६० मिनिटांचे चॅलेंज दिले होते. तीन नवे स्पर्धक वाईल्ड कार्ड एन्ट्रीतून आल्यामुळे बिग बॉसच्या गरातील स्पर्धा अधिक चुरशीची होणार आहे. निक्की तांबोली आता बिनधास्त झालेली दिसते. कारण तिला वाटते की, ६० मिनिटांचा एपिसोड तिच्या भोवतीच फिरत आहे. राहुल वैद्य आणि कुमार सानू यांनी स्वतःला ९ मिनिटांचा फेयर स्कोर दिला आहे.
बिग बॉसमध्ये अभिनेत्री नोरा फतेही आणि सिंगर गुरु रंधावा हे दोघे 'नाच मेरी रानी' या गाण्याच्या प्रमोशनसाठी गेले होते. बिग बॉसमध्ये सध्या जैस्मिन भसीन आणि एजाज खानसारखे तगडे स्पर्धकही आहेत.