महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

१८ वर्षाच्या करिअरमध्ये अभिषेकचे फक्त ८ चित्रपट हीट, तरीही 'हा' रेकॉर्ड नावावर

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा आज ४३वा वाढदिवस आहे. त्याने सिनेसृष्टीत १८ वर्षे पूर्ण केली आहेत. 'रेफ्यूजी' चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल करू शकला नाही. मात्र, अभिषेकच्या अभिनयाची चुणूक यामध्ये पाहायला मिळाली. त्याच्या १८ वर्षांच्या करिअरमध्ये त्याचे फक्त ८ चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात या काही खास गोष्टी....

By

Published : Feb 5, 2019, 1:18 PM IST

अभिषेक बच्चन

मुंबई - बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा आज ४३वा वाढदिवस आहे. त्याने सिनेसृष्टीत १८ वर्षे पूर्ण केली आहेत. 'रेफ्यूजी' चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल करू शकला नाही. मात्र, अभिषेकच्या अभिनयाची चुणूक यामध्ये पाहायला मिळाली. त्याच्या १८ वर्षांच्या करिअरमध्ये त्याचे फक्त ८ चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात या काही खास गोष्टी....

अभिषेक बच्चनचे सुरुवातीच्या काळात बरेच चित्रपट फ्लॉप ठरले. मात्र, तो हार मानायला तयार नव्हता. स्क्रिप्टवर लक्ष न देता चित्रपटात भूमिका स्विकारणं त्याला फार महागात पडलं. यामुळे त्याच्या ४ वर्षाच्या करिअरमध्ये एकापाठोपाठ १७ चित्रपट फ्लॉप ठरले. त्यानंतर २००४ साली 'धुम' चित्रपटाने त्याला किक दिली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.

त्यानंतर त्याने 'बंटी और बबली', 'युवा', 'ब्लफमास्टर', 'गुरू' आणि दोस्ताना यासारखे दमदार चित्रपट बॉलिवूडला दिले. त्याच्या १८ वर्षाच्या करिअरमध्ये त्याला अनेक कठिण प्रसंगाचा सामना करावा लागला. एका माध्यमाच्या मुलाखतीत त्याने सांगितले होते, की जेव्हा तुमचे एकापाठोपाठ एक चित्रपट फ्लॉप होत जातात, तेव्हा लोक तुमचा फोन देखील उचलत नाहीत. आपण फ्लॉप ठरतोय, ही भावना खरंच खूप वेदनादायी असते. यामुळे आपण मानसिकदृष्ट्या हतबल होऊन जातो. पुढे त्याने अमिताभ बच्चनसोबत 'पा' चित्रपटात त्यांच्या वडिलांची भूमिका साकारली होती. हा चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटासाठी अभिषेक बच्चनच्या नावाची 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद झाली आहे.

अभिषेक बच्चनला बालपणी डाइलेक्सिया नावाचा आजार होता. २००७ साली आमिर खानच्या 'तारे जमीं पर' या चित्रपटात या गोष्टीचा खुलासा झाला होता. सुरुवातीला जेव्हा अभिषेकचे चित्रपट फ्लॉप व्हायला लागले होते, तेव्हा त्याने 'एलआयसी एजंट' म्हणून नशिब आजमावले होते. अभिनयाव्यतिरिक्त अभिषेकला विविध देशांचे बोर्डिंग कार्ड जमा करण्याचा छंद आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाले, तर करिश्मा कपूरसोबतच्या नात्यामुळे तो चर्चेत आला होता. अमिताभ बच्चन यांच्या ६०व्या वाढदिवशी त्याची करिश्मासोबत एंगेजमेंट झाल्याच्याही चर्चा होत्या. मात्र, तीन महिन्यातच त्यांचे नाते तुटले.

'धुम-२' चित्रपटावेळी तो ऐश्वर्या रायला भेटला. 'गुरू' चित्रपटाच्या दरम्यान त्यांचे सूत जुळले. त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. २० एप्रिल २००७ साली दोघांनीही लग्नगाठ बांधली. त्यावेळी ऐश्वर्या ३३ वर्षाची होती, तर अभिषेक ३१ वर्षाचा होता. अभिषेकच्या वाढदिवसानिमित्त ऐश्वर्या रायने सोशल मीडियावर 'बेबी' असं कॅप्शन देत त्याच्या लहाणपणाचा एक खास फोटो शेअर केला आहे. दोघेही लवकरच सोबत स्क्रिन शेअर करणार आहेत. 'गुलाबजामून' या चित्रपटात दोघेही सोबत झळकणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details