महाराष्ट्र

maharashtra

Kangana Ranaut Apologizes : कंगना रणौतच्या कारला शेतकऱ्यांचा घेराव, अभिनेत्रीने मागितली माफी

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut') मनालीहून मुंबईला जात असताना कारने पंजाबमधून प्रवास करीत होती. त्यावेळी तिच्यासोबत सुरक्षारक्षकही सोबत होते. परंतु पंजाबमधील कीरतपूर साहिब टोल प्लाजाजवळ शेतकऱ्यांनी तिच्या गाडीला घेरले. कंगनाने माफी मागावी अशी मागणी शेतकरी करीत होते. शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. बराच गोंधळ झाल्यानंतर कंगनाने सबुरीची भाषा केली व माफीही (Kangana Ranaut apologizes) मागितली. त्यानंतरच तिची गाडी गर्दीतून पुढे जाऊ शकली. कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचा याबाबतचा एक व्हडिओ शेअर केला आहे.

By

Published : Dec 3, 2021, 5:27 PM IST

Published : Dec 3, 2021, 5:27 PM IST

Updated : Dec 3, 2021, 7:15 PM IST

कंगना रणौतच्या कारला शेतकऱ्यांचा घेराव
कंगना रणौतच्या कारला शेतकऱ्यांचा घेराव

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) कारने मनालीहून मुंबईला जात असताना पंजाबमधून प्रवास करीत होती. पंजाबमधील कीरतपूर साहिब टोल प्लाझाजवळ शेतकऱ्यांनी तिच्या गाडीला घेरले. त्यावेळी तिचे सुरक्षारक्षकही तिच्या सोबत होते. कंगनाने माफी मागावी अशी मागणी शेतकरी करीत होते. शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. बराच गोंधळ झाल्यानंतर कंगनाने सबुरीची भाषा केली व माफीही (Kangana Ranaut Apologizes) मागितली. त्यानंतरच तिची गाडी गर्दीतून पुढे जाऊ शकली. कंगनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर तिचा याबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना सातत्याने शेतकऱ्यांना टार्गेट करत आहे. कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन करत असतानाही कंगना रणौतने शेतकऱ्यांवर वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामुळे तिला अनेकदा ट्रोलचा सामना करावा लागला होता. पंजाबचा सुपरस्टार दिलजीत दोसांझसोबतचा तिचा वादही चर्चेत होता. आता कंगना रणौत पंजाबला गेली असताना तिच्या गाडीवर हल्ला झाला आहे. यादरम्यानचा व्हिडिओ अभिनेत्रीने शेअर केला आहे.

कंगना रणौतच्या कारला शेतकऱ्यांचा घेराव

कंगना रणौतच्या गाडीला शेतकऱ्यांनी घेरले

शुक्रवारी कंगना रणौतने इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती पंजाबमधून प्रवास करीत आहे आणि तिची कार शेतकऱ्यांनी घेरलेली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. व्हिडिओ शेअर करताना कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिले - मी पंजाबमध्ये प्रवेश करताच माझ्या कारवर जमावाने हल्ला केला. ते शेतकरी असल्याचे सांगत आहेत. याशिवाय कंगनाने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती कारमध्ये बसलेली दिसत आहे. यादरम्यान कंगना म्हणते की- माझ्या कारला पुढे जाऊ दिले जात नाही. मी राजकारणी आहे का? हे कसले वर्तन आहे?

कंगनाने व्यक्त केली आपली अडचण

कंगना रणौतने इंस्टाग्राम स्टोरीवर छोट्या क्लिप शेअर केल्या आहेत. ज्यात ती तिच्या सद्यस्थितीबद्दल बोलताना दिसत आहे. या देशात मॉब लिंचिंगचे प्रकार घडत आहेत. माझ्यासोबत सुरक्षा नसेल तर माझे काय होईल? इतके पोलीस आहेत, त्यानंतरही मला बाहेर जाऊ दिले जात नाही. मला शिवीगाळ केली जात आहे. जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. येथील परिस्थिती बिघडलेली आहे. या देशात असे घडत आहे, यावर माझा विश्वासच बसत नाही.

कंगना रणौतचा वादांशी घनिष्ठ संबंध आहे. प्रत्येक मुद्द्यावर प्रतिक्रिया देण्यात ती पुढे असते. पण असे करून ती स्वतःला अडचणीत आणत असते. कंगनावर यापूर्वीच ट्विटरने बंदी घातली आहे. याशिवाय तिच्या वक्तव्यावरून तिला खूप ट्रोल देखील केले जाते. पण अभिनेत्री कंगना नवा वाद निर्माण करण्यासाठी नेहमी तत्पर असते.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर अभिनेत्री कंगनाचा 'थलायवी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. याशिवाय सध्या ती 'धाकड', 'तेजस' आणि 'टिकू वेड्स शेरू' या चित्रपटांमध्ये काम करीत आहे.

हेही वाचा - Nashik Sahitya Sanmelan : अभिजात भाषेच्या दर्जाकरिता १२ कोटी जनता राष्ट्रपतींना पत्र पाठवणार- सुभाष देसाई

Last Updated : Dec 3, 2021, 7:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details