नवी दिल्ली -पूर्व लडाखमध्ये चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर केलेल्या घुसखोरीवर कारवाई करण्यात भारत कचरत आहे, असे मत माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटोनी यांनी व्यक्त केले आहे. सध्याची दक्षिण आशियाई देशांची स्थिती लक्षात घेत आशियाई ड्रॅगन जरा जास्तच आक्रमक झाला आहे, असेही ते म्हणाले.
“चीनला आता कळाले आहे की, भारत कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे चीनी ड्रॅगन जास्तच आक्रमक झाला आहे. भारत सरकार चीनवर कारवाई करण्यास का कचरत आहे, असा विचार प्रत्येकजण करत आहे” असे अँटोनी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. काल पँगोंग त्सो सरोवर क्षेत्रात चीनने एलएसीचे उल्लंघन केल्याबद्दल विचारले असता, भारतीय सैन्याने असे काही घडले असल्याचे नाकारले आहे.
भारताच्या माजी संरक्षणमंत्र्यांनी नमूद केले की, आता जवळजवळ गेल्या चार महिन्यांपासून पूर्व लडाखमध्ये चीनी लोकांच्या लिबरेशन आर्मी ट्रुप्स एलएसीचे उल्लंघन करत आहेत. ज्यामुळे १५ जून रोजी गलवान खोऱ्यात पीएलएच्या सैन्यानी केलेल्या प्राणघातक चकमकीत भारताने २० सैनिक गमावले. पुष्टी न केलेल्या अहवालात, या चकमकीत पीएलएचे ४० सैनिक मरण पावल्याचे सांगितले गेले आहे, मात्र चीनने याबाबत अजून एक शब्दही उच्चारला नाही.
“ गेल्या चार महिन्यांपासून सीमा क्षेत्रात सातत्याने हल्ले होत आहेत. आतापर्यंत भारत सरकार फक्त निवेदने देण्याची कामं करत आहे. तर दुसरीकडे चीन मात्र सीमा क्षेत्रात आपल्या सैन्याची जमवाजमव करत आहे, ” असेही अँटोनी म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, पीएलए आपल्या सैन्याची जमवाजमव फक्त पूर्व लडाखमध्येच करत नाहीये, तर अरुणाचल प्रदेश आणि सिक्किममधील भारत-चीन सीमेवरही ही जमवाजमव सुरू आहे.