इस्लामाबाद (पाकिस्तान)- जोपर्यंत जगातील सगळे देश एकत्र कोरोना विषाणूवर उपचारासाठी उपाय शोधत नाही. तोपर्यंत आपण कोरोनावर मात करू शकत नाही, असे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी गुरुवारी केले.
जोपर्यंत कोरोनाला जागतिक समस्या मानून निराकरण केले जात नाही, तोपर्यंत जग या मंदीपासून मुक्त होणार नाही, असेही खान म्हणाले. या कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी विकसनशील देशांना मदत केल्याबद्दल त्यांनी जी-२० परिषदेचे आभार मानले. विकसित देशांनी एकत्र येऊन यावर मार्ग काढला तरच आपण सर्व त्यातून मुक्त होऊ. जर आपण याला जागतिक समस्या मानले तरच जग त्यातून बाहेर येईल, असे खान म्हणाले.