1) मुंबई- मुंबईची ओळख असलेल्या नायगाव, ना. म. जोशी मार्ग आणि वरळी बीडीडी चाळीचा पुनर्विकास राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत म्हाडाच्या माध्यमातून हाती घेतला. पण आता मात्र सरकार आणि म्हाडाचा हा ड्रीम प्रोजेक्ट ठप्प होणार आहे. कारण नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकासातील कंत्राटदार एल अँड टीने हा प्रकल्प गुंडळण्याचा निर्णय घेतला आहे.
सविस्तर वाचा-Exclusive: म्हाडाला L&T चा 'जोर का झटका'.. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातून माघार
2)रायगड- महाड शहरातील काजळपुरा परिसरात असलेली तारिक गार्डन ही पाच मजली इमारत सोमवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोसळली. या घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्यात सुमारे अनेक जण अडकल्याची माहिती मिळाली आहे. इमारतीत 47 कुटुंबं राहत होती. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांकडून बचावकार्य सुरू आहे.
सविस्तर वाचा-LIVE महाड इमारत दुर्घटना : ८ जणांचा मृत्यू; १८ तासांनंतर ४ वर्षीय मुलाला बाहेर काढण्यात यश
3)रायगड - नात, नातू धावत येऊन नाना म्हणून हाका मारीत धावत येतील, या आशेने आजोबांचे डोळे पडलेल्या तारिक गार्डन इमारतीच्या ढिगाऱ्याकडे लागले आहे. महंमद अली वुकेय यांची ही करुण कहाणी आहे. महंमद अली यांची मुलगी आणि दोन नाती, एक नातू हे तारिक गार्डन इमारती दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या दुर्घटनेतून चारही जण सुखरूप बाहेर पडावे, अशी भाबडी आशा महंमद अली यांनी धरली आहे.
सविस्तर वाचा-महाड इमारत दुर्घटना : ढिगाऱ्याखालून 'नाना' अशी हाक मारत माझे नातू धावत येतील, आजोबांची आशा
4) रायगड -'देव तारी त्याला कोण मारी' अशी एक प्रचलित म्हण आहे. ही म्हण एका बालकाच्या रुपाने सत्यात उतरली आहे. महंमद बांगी (4) या चिमुकल्याला तब्बल 18 तासाच्या प्रयत्नानंतर ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. तर, आई नौशिन बांगी यांचा मृत्यू झाला असून दुसरी मोठी मुलगी आयशा ही अद्याप सापडलेली नाही. आजोबा महंमद अली हे आपले नातू आणि मुलगी जिवंत असू दे याबाबत प्रार्थना करीत होते. त्यांच्या या प्रार्थनेला ईश्वराने साद दिली आहे. सध्या महंमदवर महाड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यावेळी मै अंधेरेमे अल्लाहसे पानी मांग रहा था, असे त्याने घरच्यांना सांगितले.
सविस्तर वाचा-मै अंधेरेमे अल्लाहसे पानी मांग रहा था, 18 तासानंतर सुखरुप वाचलेल्या महंमदची आपबीती
5) नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रीमंडळाच्या संसदीय व्यवहार समितीने संसदेचे मान्सून अधिवेशन 14 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरला घेण्याची शिफारस केली आहे. सूत्राच्या माहितीनुसार संसदेत एकूण 18 बैठक व्यवस्था असणार आहेत. त्यांच्या तारखा लवकरच घोषित करण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसदेच्या इतिहासात 1952 नंतर बैठक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे.
सविस्तर वाचा-संसदेचे मान्सून अधिवेशन 14 सप्टेंबरपासून होणार सुरू ? बैठक व्यवस्था बदलणार