महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धक्कादायक..! कुटुंबातील १३ जणांच्या जाचाला कंटाळून चिमुकलीसह दाम्पत्याची आत्महत्या

कुटुंबातील सदस्यांच्या त्रासाला कंटाळून चिमुकलीसह पती-पत्नीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी महिलेने लिहिलेल्या चिठ्ठीवरुन पोलिस 13 जणांनी चौकशी करत आहेत.

By

Published : Mar 3, 2020, 8:59 AM IST

Updated : Mar 3, 2020, 11:52 AM IST

मृत तीघे
मृत तीघे

ठाणे- कुटुंबातील सदस्यांच्या त्रासाला कंटाळून चिमुकलीसह पती-पत्नीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना डोंबिवली नजीक वाकलन गावात असलेल्या निळजे रेल्वे स्थानकाजवळ एका घरात घडली आहे. खळबळजनक बाब म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी पत्नीने एक चिठ्ठी लिहली. त्यामध्ये आपल्याच कुटुंबातील तेरा जणांनी त्रास दिल्याचे सांगून आत्महत्या करीत असल्याचे उल्लेख करण्यात आले आहे. त्या शिवाय ती चिठ्ठी तिने फोटो काढून माहेरच्या नातेवाईकांना व्हाट्सअॅपवर पाठवली होती. यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.

आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी

शिवराम पाटील त्याची पत्नी दीपिका आणि मुलगी अनुष्का, असे आत्महत्या करणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण शीळ रोडवरील निळजे रेल्वे स्थानकानजीक असलेल्या वाकलन गावात मृतक शिवराम हे कुटुंबासह राहत होते. त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी काही दिवसापासून या पती-पत्नीचा कौटुंबिक वादातून छळ सुरू केला होता. अखेर कुटुंबातील सदस्यांच्या त्रासाला कंटाळून या पती-पत्नीने टोकाचे पाऊल उचलत राहत्या घरात चिमुकलीसह दोघा पती-पत्नीने ही गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच डायघर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी डायघर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठीत लिहून ठेवलेल्या कुटुंबातील 13 जणांची पोलिसांनी चौकशी सुरू करत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

हेही वाचा -दिल्ली दंगलीसाठी काँग्रेस आणि आप जबाबदार - रामदास आठवले

Last Updated : Mar 3, 2020, 11:52 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details