महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना 'एकादशी' पावणार

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी 3 दिवस 2 रात्री पाण्याच्या टाकीवर बसून केलेले आंदोलन, बुधवारी रात्री महापौरांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आले आहे.

By

Published : Jul 11, 2019, 2:36 PM IST

महापौर शोभा बनशेट्टी यांची आंदोलक कर्मचारी आणि प्रहार संघटनेच्या नेत्यांसोबत झालेली बैठक

सोलापूर-पाण्याच्या टाकीवर बसून सुरू असलेले परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. एक महिन्याचा पगार एकादशीच्या दिवशी आणि पुढील आठ दिवसात दुसऱ्या महिन्याचा पगार देण्याचे आश्वासन देण्यात आल्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

बैठकीचे वृत्त
प्रहार संघटनेच्या पूढाकारातून मागील तीन दिवसापासून परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होते. बुधवारी आंदोलकांनी मूख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा अडविण्याचा इशारा दिल्यानंतर या आंदोलनावर महापालिकेत चर्चा सुरू झाली. बूधवारी रात्री उशिरा पर्यंत आंदोलकांशी चर्चा झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
मागील अनेक महिन्यांपासून परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगार झालेला नाही. पगार मिळत नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर बुधवारी रात्री उशिरा महापौर शोभा बनशेट्टी यांची आंदोलक कर्मचारी आणि प्रहार संघटनेच्या नेत्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या पगारा संदर्भात तोडगा निघाला. 11 जूलै रोजी एक महिन्याचा पगार आणि आठ दिवसात दूसऱ्या महिन्याचा पगार देण्याचे आश्वासन महापौरांनी दिल्यानंतर कामगारांनी त्यांचे आंदोलन मागे घेतले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details