नाशिक - ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल नुकतेच जाहीर झाले. यामध्ये महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात यश मिळाल्याचे चित्र आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या समन्वय समितीमुळे ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश मिळाले, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. देशमुख नाशिक दौऱ्यावर असतांना पत्रकारांशी बोलत होते.
यापुढील निवडणुकीत देखील महाविकास आघाडी एकत्र-
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राज्यात सर्वत्र महाविकास आघाडीने फिल्डिंग लावली होती. ग्रामपंचायत निवडणुकीत मिळालेले यश, हे महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेस आणि कॉंग्रेसच्या समन्वयाचे फळ आहे. या आधी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत देखील महाविकास आघाडीला यश मिळाले होते. आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मिळाले आहे. पुढील निवडणुकीत देखील महाविकास आघाडी एकत्र असेल, असा विश्वास गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला.
विरोधकांनी मुंगेरीलाल के सपने पाहणं सोडावे-