महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

एक लाख शेतमजुरांना कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट - कृषिमंत्री - agriculural minister of maharashtra

राज्यातील शेतमजुरांनी कौशल्य आधारित प्रशिक्षणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. या अंतर्गत सुमारे 1 लाख शेतमजुरांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

कृषीमंत्री दादाजी भुसे
राज्यातील शेतमजूरांना कौशल्य आधारित प्रशिक्षणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

By

Published : Jul 31, 2020, 12:22 PM IST

नाशिक- राज्यातील शेतमजुरांना कौशल्य आधारित प्रशिक्षणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. या अंतर्गत सुमारे 1 लाख शेतमजुरांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्या कापूस व मका या पिकांसाठी फवारणीची कामे मोठ्या प्रमाणावर करावी लागणार आहेत. त्यामुळे कीटकनाशके फवारणीच्या कौशल्यावर अधारित प्रशिक्षण शेतमजुरांना देण्याचा कार्यक्रम प्राधान्याने हाती घेतला आहे, अशी माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत राज्यातील 1 लाख मजूरांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीस सुरुवात झाली असून प्रशिक्षण घेतलेल्या शेतमजुरांना प्रमाणपत्र देखील देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संबंधित माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध केली जाईल, असे ते म्हणाले.

सद्यस्थितीमध्ये कापूस व मका पिकांसाठी फवारणीची कामे मोठ्या प्रमाणावर करावी लागणार आहे. या क्षेत्रांत कीटकनाशकांचा योग्य वापर होण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. तसेच मजुरांची सुरक्षितता देखील जपली जाईल, असे भुसे यांनी सांगितले.

शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतीमधील विविध निविष्ठांसोबत शेतमजुरांची कार्यक्षमता हा घटक महत्वाचा आहे. सध्याच्या पीक पद्धतीमध्ये औषध फवारणी, फळबागांची छाटणी, बीबीएफद्वारे पेरणी, कापूस वेचणी, सूक्ष्म सिंचनाची देखभाल दुरुस्ती, रोपवाटीकेतील कामे, नियंत्रित शेती, शेतमालाची स्वच्छता व प्रतवारी इ. सर्व कामे ही कौशल्यावर आधारित आहेत. याबाबत शेतमजूरांना कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे कामाची गुणवत्ता, दर्जा व वेग सुधारण्यास मदत होईल व शेतकऱ्यांना देखील त्याचा फायदा होईल.

शेतमजूरांचे कौशल्य वाढवणे, ग्रामीण भागात रोजगार निर्मितीस चालना, सुरक्षितता व आरोग्य संरक्षण, कार्यक्षम व्यावसायिक सेवांची शेतकऱ्यांना उपलब्धता, पर्यावरणपूरक कृषि पद्धतीस प्रोत्साहन व गुणवत्तापूर्ण शेतीमालाचे उत्पादन करण्यासाठी शेतमजूरांना कौशल्य आधारित प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. संबंधित प्रशिक्षणाबाबत जिल्ह्यातील आत्मा प्रकल्प संचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधून ग्रामीण भागातील शेतमजुरांनी नोंदणी करावी आणि प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details