महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 21, 2019, 5:44 PM IST

Updated : Sep 21, 2019, 6:00 PM IST

ETV Bharat / city

'EVM मध्ये घोळ करण्यासाठी दोन दिवसांनी मतमोजणी होणार आहे का?'

आजपर्यंत झालेल्या निवडणुकात मतदान झाल्यावर दुसऱ्या दिवशी मतमोजणी होत असते. मात्र, आता ईव्हीएम मशीन आहे, एक बटन दाबल्यावर कोणाला किती मतदान झाले हे समजते, असे असतानाही मतमोजणीसाठी उशीर का? असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ

नाशिक- राज्यात 21 ऑक्टोबरला विधानसभेची निवडणूक होत आहे. तर, 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. मतदान झाल्यावर मतमोजणी दोन दिवसांनंतर का? ईव्हीएम मशीनचा घोळ करण्यासाठी का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. ते नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ

आजपर्यंत झालेल्या निवडणुकांत मतदान झाल्यावर दुसऱ्या दिवशी मतमोजणी होत असते. मात्र, आता ईव्हीएम मशीन आहे, एक बटन दाबल्यावर कोणाला किती मतदान झाले हे समजते. असे असतानाही मतमोजणीसाठी उशीर का? असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला. भाजप जेवढ्या जागा निवडून येणार असे सांगते, तेवढ्याच जागा निवडून येतात. मग ईव्हीएम मशीनमध्ये गडबड तर होत नसेल ना? असा प्रश्न आपोआप नागरिकांना पडत असल्याचे भुजबळ म्हणालेत.

हेही वाचा- जनता युती सरकारला त्रासली असून आम्हाला पुन्हा सत्तेत बसवणार - बाळासाहेब थोरात

येवला मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढणार

आम्ही निवडणुकीची तयारी दोन महिन्यांपासून करत आहोत. भाजप मात्र एक झाली की दुसऱ्या निवडणुकीची जोरदार तयारी करत असते. मग हे काम कधी करत असतील? असा टोला देखील भुजबळ यांनी भाजपला लगावला. काहीही असले तरी प्रत्येक पक्ष निवडणूक लढण्यास तयार असल्याचे भुजबळ म्हणाले. तसेच मी कुठल्याही पक्षात जाणार नाही. मी येवला मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढणार असल्याचे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा- '220 प्लस जागा निवडून येतील; युतीची चर्चा अंतिम टप्प्यात'

Last Updated : Sep 21, 2019, 6:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details